शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:31 AM

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा ...

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा (तुळ), आदी १४ गावांतील खरिपातील ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी अर्धा पावसाळा संपत आला असतानाही या परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडेच असून, या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी तुळजापूर मंडळात सर्वाधिक ९ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला. याशिवाय, ३३८ हेक्टरवर उडीद, २४० हेक्टर मूग, २१२ हेक्टर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. या भागात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी रोहिणी नक्षत्रातील पावसाने शेवटच्या टप्प्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य नक्षत्रात अधूनमधून झालेल्या पावसामुळे कशीबशी पिके तग धरून राहिली. मात्र, गेल्या पंधरवड्यात पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती. हलक्या रानावरील पिके तर चक्क जळून गेल्याने शेतकऱ्यांनी ती उपटून जनावरांना टाकली. मागच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले खरे; मात्र उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान, सरसकट पिकांचे पंचनामे करून पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

सध्या सोशल मीडियावर २५ टक्के विमा कंपनी भरपाई मिळणार, अशी पोस्ट फिरते आहे. मात्र, शंभर टक्के नुकसान झाले तर ४५ हजार रुपये हेक्टरी विमा भरपाई मिळते. त्यानुसार २५ टक्क्यांप्रमाणे ११ हजार २०० रुपये मिळणार असतील तर ही शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल.

- आबासाहेब कापसे, सिंदफळ.

गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात पन्नास टक्के घट होणार आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या झाडांना शेंग कमी लागल्यात. त्यातही बहुतांश शेंगांमध्ये बी भरलेले नसल्याने उतार कमी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- रणजित नंन्नवरे, हंगरगा (तुळ).

मी दोन बॅग उडीद पेरला होता. मात्र, त्याच्या फूल धारणेच्या व फळधारणेच्या काळात पाऊस झाला नसल्याने उडीद करपून गेला. त्यामुळे काढून बांधावर फेकून दिला. त्यामुळे विमा कंपनीने शंभर टक्के भरपाई देणे गरजेचे आहे.

- बळी सुरवसे, मोर्डा

280821\img-20210814-wa0112.jpg

काक्रंबा परिसरातील जळून जात असलेली सोयाबीनची पिके