शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात हरभरा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:24 AM

उस्मानाबाद : आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हरभरा विक्रीसाठी २२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ...

उस्मानाबाद : आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात २१ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हरभरा विक्रीसाठी २२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, खुल्या बाजारात अधिक दर असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा ओढा कमी आहे. २१ केंद्रांवर ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली हाेती. त्यापैकी १६ केंद्रांवर २ हजार २६६ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केला आहे, तर ५ केंद्रांवर खरेदी शून्य झाली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. मात्र, दुसरीकडे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला. मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी उरकून घेतल्या. ज्वारी, गव्हासोबतच हरभऱ्याचाही पेरा केला. निसर्गाच्या कृपेने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. केंद्र शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला. शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी २१ केंद्र कार्यान्वितही केली आहेत. या केंद्रांवर १५ फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली होती. ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी २ हजार २६६ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले. २१ केंद्रांपैकी १६ केंद्रांवर २५ हजार ५८१ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे, तर ५ केंद्रांवर खरेदी शून्य आहे.

चौकट...

केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. आडतीवर ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, अनेक शेतकरी केंद्रावर पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिवाय चाळणी व हमालीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडतीवर क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयाने कमी भाव मिळत असला, तरी लवकर पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.

कोट...

जिल्ह्यात २१ हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ८ हजार २१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्वच शेतकऱ्यांना संदेश पाठिवण्यात आले आहेत. २ हजार २६६ शेतकऱ्यांचा २५ हजार ५८१ क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. १३ कोटी रुपयांची रक्कम त्यांना वितरीत करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यांचा हरभरा विक्रीचा राहिला आहे त्यांनी २५ जूनपर्यंत हरभरा विक्रीसाठी घेऊन यावा.

- व्ही. एच. वाचपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.