शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली

By गणेश कुलकर्णी | Updated: September 12, 2023 18:16 IST

तीन गावच्या शेतकऱ्यांचे आंदोलन; नगर रोडवरील वाहतूक ठप्प

धाराशिव : कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेंतर्गत होणाऱ्या भूम तालुक्यातील हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून गोरमाळा तलावात पाणी सोडण्याची तरदूत करावी, अशी मागणी करीत गोरमाळा, वरुड व बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्ता रोखून आंदोलन केले. गोरमाळा फाटा ते नगर रोडवर केलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे व प्रभारी नायब तहसीलदार अनिल महामुनी यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे, तालुक्यात गेल्या काही वर्षांत सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावानजीकचे अनेक शेतकरी शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतरण रोखण्यासाठी गोरमाळा तलावात दरवर्षी पाणी सोडणे आवश्यक आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळाअंतर्गत येणारा गोरमाळा लघू तलाव गेल्या अनेक वर्षांपासून कोरडा राहत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यातून या तलावासाठी पाण्याची तरदूत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात गोरमाळा सरपंच अमोल औताडे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, अमृत भोरे, प्रवीण खटाळ, दत्तात्रय चव्हाण, अतुल शेळके, चुंबळी सरपंच कानिफनाथ गिराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, भरत नलवडे, बाळू नलवडे, संभाजी नलवडे, सतीश वारे, भरत नलवडे, आबासाहेब पिंगळे, निशिकांत शेळके, दत्तात्रय औताडे, सूर्यकांत औताडे, शिवाजी औताडे, आश्रुबा चोरमले, विलास क्षीरसागर, अण्णासाहेब तांबे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

...तर अनेक गावांचा पाणीप्रश्न लागेल मार्गीया तलावात हिवर्डा ते सोनगिरी कालव्यातून पाणी सोडल्यास परिसरातील १२ ते १५ गावांचा पिण्याच्या पिण्याचा प्रश्न तर कायमस्वरूपी मार्गी लागेलच, शिवाय तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचीही सोय होईल, असे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादRainपाऊस