शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:33 AM

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी ...

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी यासाठी द्राक्ष झाडाच्या बुंध्याला ओलावा टिकून राहण्यासाठी सोयाबीनचे भुस्कट, उसाचे पाचट द्राक्षाचा झाडाभोवताली लावून मलचिंग करण्यात येत आहे.

तामलवाडी भागात द्राक्षबागेचे क्षेत्र दुप्पटीने वाढत चालले आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बागायदार शेतकऱ्यांनी माळरानावर पिकविलेली द्राक्ष परदेशात विक्रीसाठी जात आहेत. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यावर फळबागा घेण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ३५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे द्राक्ष तोडणीनंतर झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीला भेगा पडून द्राक्षवेलीला धोका पोहोचू शकतो. हा धोका ओळखून बुडाजवळ जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडाशेजारी सोयाबीनचे भुसकट, उसाचे पाचट अंथरुण झाडाला दिलेल्या पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी मलचिंग केले जात आहे. त्यासाठीचा खर्च वाढला असला, तरी बागा जगविण्यासाठी हा खर्च करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

चौकट

पाचटाला आला भाव

उसतोडणीनंतर फडात राहणारे शिल्लक पाचट पूर्वी शेतकरी जाळून टाकत. मात्र, द्राक्षबागेचे वाढलेले क्षेत्र पाहता, बागायतदार ते पाचट ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून मशीनद्वारे गाठी बांधून घेत आहेत. एका पाचटाच्या गाठीसाठी २० रुपये मोजावे असून, वाहतूक, बागेत अंथरणे, यासाठी १० रुपये खर्च असा एकूण एका पाचटाच्या गाठीसाठी ३० रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी वर्षभरासाठी ३ लाख रुपये खर्च करावा लागत आहे

कोट...........

काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावांतून २५० शेतकऱ्यांनी द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी ६० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यात प्रमाणपत्र कृषी कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० टन द्राक्ष निर्यात झाले असून, मार्च महिन्यात द्राक्ष परदेशात निर्यात होण्यास गती येईल.

- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी, ता.तुळजापूर

देशभरात झालेल्या इंधन दरवाढीचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसू लागला आहे. द्राक्षबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारी फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, तसेच माल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना इंधनाची गरज भासते. बाजारात द्राक्षाला मिळणारा भाव अन्‌ उत्पादनांसाठी होणारा खर्च पाहता, इंधनाची दरवाढ द्राक्ष बागायतदारांना अडचणीची ठरली आहे.

- राजाभाऊ मोटे, शेतकरी, गोंधळवाडी