शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
5
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
6
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
8
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
9
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
10
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
11
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
12
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
13
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
14
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
16
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
17
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
19
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
20
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात मिळताहेत पाच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:36 AM

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यांचे दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा ...

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यांचे दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता व बाल मृत्यूदरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत तुळजापूर तालुक्याला ६ हजार ९८ चे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत तुळजापूर आरोग्य यंत्रणेने ९९ टक्के काम पूर्ण केले असून, ६ हजार ६४ महिलांना २ कोटी ४३ लाख ५३ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डीबीटीद्वारे जमा केले आहेत.

लाभासाठी कुठे संपर्क करायचा...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी संपर्क साधता येईल.

ही कागदपत्रे हवी...

लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी गरोदर महिलेची नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिला, दुसरा व तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थीचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स, बाळाचा जन्माचा दाखला, माता बाल संरक्षक कार्ड इत्यादी देणे आवश्यक आहे.

तीन टप्प्यात मिळणार लाभ...

लाभार्थीने गरोदरपणाची नोंद केल्यानंतर १५० दिवसाच्या आत १ हजार, किमान १ प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर २ हजार रुपयांचा हप्ता मिळतो. तिसरा हप्ता हा प्रसूती होऊन बाळाला लसींची मात्रा दिल्यानंतर २ हजार रुपयांचा येतो.

पहिला टप्पा -१ हजार रुपये

दुसरा टप्पा -२ हजार रुपये

तिसरा टप्पा -२ हजार रुपये

पात्रतेचे निकष काय...

पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या नोकरदार महिलांना ही योजना लागू नाही. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच लागू राहील.