शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

भरधाव कंटेनरने बैलगाडीला उडविले; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:11 PM

वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना घडला भीषण अपघात

उस्मानाबाद  -  वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना भरधाव कंटेनरने बैैलगाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेटे कुटुंबीय वेळा अमावस्या सण साजरा करण्यासाठी बुधवारी सकाळी बैलगाडी घेवून आपल्या शेतात गेले होते. सण साजरा करून ते सायंकळी बैलागडीतूनच गावाकडे परतत होते. ही बैैलगाडी गावाकडे जात असल्याचे पाहून माळवदे आणि पवार कुटुंबियही त्यात बसले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही बैैलगाडी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक आली होती. 

याचवेळी औरंगाबादहून उस्मानाबादकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. केए.५६/४६५३) या बैलगाडीस जोराची धडक दिली. या अपघातात दोन महिला, एक मुलगी व एक मुलगा असे चारजण ठार झाले. यापैकी  फुनूबाई मंतू पवार (वय ६०), उमा महेश माळवदे (वय ३५), गुजंन माळवदे (वय १२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.  तर युवराज दत्तात्रय शेटे या पाच वर्षीय चिमुकल्याची उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. दरम्यान, दत्तात्रय नवनाथ शेटे (वय ३४) हे जखमी असून, उस्मानाबाद शहरातील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी बैलगाडी अक्षरश: चक्काचूर झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद