शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

By महेश गलांडे | Updated: April 17, 2019 14:47 IST

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे.

उस्मानाबाद - लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख गावचं मतदानावर बहिष्कार टाकत आहे. विशेष म्हणजे या गावातील तरुण मुलगा आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असून त्यांनाही मतदानावर बहिष्कार टाकण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.   

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी नेता असलेल्या शंकर गायकवाड यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली. मात्र, येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शंकर गायकवाड यांना गावातील एकही मत मिळणार नाही. विशेष म्हणजे शंकर यांच्या आई-वडिलांचेही मतदान शंकर यांना पडणार नाही. कारण, या गावातील सर्वच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील समस्या सोडविण्यात स्थानिक नेते अपयशी ठरल्याचे सांगत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून सर्वच गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साधारणत: 1200 ते 1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावात अनेक स्थानिक नेत्यांनी संपर्क केला. मात्र, अद्याप गावकरी मानायला तयार नाहीत. ग्रामस्थांनी चक्क गावाच्या बाहेर एक डीजिटल फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. तसेच, गावकऱ्यांकडून पत्रेकही छापण्यात आली आहेत. त्या पत्रकारवरही ''अभी नही तो कभी नही'' असा संदेश लिहून गावातील  समस्यांची यादीच देण्यात आली आहे. 

गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची वैशिष्टे गावात येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही.पाण्याची कसलिही सोय नाही.देश स्वतंत्र झाल्यापासून बससेवा नाही.जिल्हा परिषद शाळा पडझडीस आली आहे, तर शाळेकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. अनेक गोर-गरीब ग्रामस्थांना रेशनकार्ड नाही. शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारी अधिकाऱ्यांचे गावाकडं दुर्लक्षअसे मुद्दे गावकऱ्यांनी छापलेल्या पत्रकात लिहिलेली आहेत.

उमेदवार शंकर गायकवाड 

उस्मानाबद लोकसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये प्रमुख लढत ही महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेचे नेते राणा जगजितसिंह तर  शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला आहे. तर, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, चळवळीतून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर गायकवाड यांनी अनेक आंदोलनातून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून दिला आहे. तर, स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलन करुन जनतेचे प्रश्नही अनेकदा मार्गी लावले आहेत. मात्र, अद्यापही गावातील प्रश्न अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे यंदा गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्यास आपलाही पाठिंबा असल्याचे शंकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.   

गावकऱ्यांच्या भूमिकेला माझाही पाठिंबा आहे, पण मी उमेदवार असल्याने मतदान करणे बंधनकारक आहे. मी मतदान न केल्यास कायदेशीर भंग होईल, असे तहसिलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे आई-वडिल आणि बायकोचेही मला मतदान मिळणार नसल्याचे शंकर यांनी म्हटले. तसेच, मला मिळणाऱ्या मतदानापेक्षा माझ्या गावकरांचे प्रश्न सुटणे गरजेचं असल्याचंही शंकर गायकवाड यांनी सांगितलं.  

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Votingमतदान