शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळांचे दरात मात्र होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:21 IST

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच ...

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच आहेत. पत्ताकोबी, फ्लावर १० रुपये, टोमॅटो १० ते १५ रुपये, वांगी, भेंडी, शिमला मिरची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बटाटा १० ते १५ रुपये किलो, कारले, दोडका ४० रुपये, गवार ५०, शेवगा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. भाज्यांचे दर उतरत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे फळांच्या किमतीत प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

खाद्यतेलाचे दर चढेच

खाद्यतेलाचे दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२३ रुपये, पामतेल १२० रुपये किलो, शेंगदाणा १५० ते १६० रुपये, मोहरी तेल १३५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तूर डाळ ९६ रुपये, हरभरा डाळ ५६, मूग ९० रुपये, उडीद ९०, मसूर डाळ ६५ रुपये किलोने विक्री होत आहे. साखरेचा दर स्थिर असून, साखर ३२ रुपये किलोने विक्री होती.

पालेभाज्या स्वस्तच

बाजारात मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती उतरलेल्याच आहेत. शेपू १० रुपये जुडी, कोथिंबीर, मेथी, चुका, पालकाची जुडी ५ रुपयास जुडी विक्री होत आहे. गाजराची आवक अधिक असल्याने गाजर १० ते १५ रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहेत.

रामफळ ८० रुपये किलो

बाजारपेठेत सफरचंद १२० ते १६० रुपये किलो, रामफळ ८०, मोसंबी १००, संत्रा ६०, द्राक्ष ६० ते ८० रुपये, चिकू ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

भाजीपाला वगळता खाद्यतेल व इतर किराणा सामानाचे दरात वाढ होत आहे. फळांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. सचिन लोखंडे, ग्राहक

मागील महिन्यात तूर डाळ ८५ रुपये किलो होती. गेल्या आठवड्यात तूर डाळ १०२ वर किलोने विक्री होत आहे. या आठवड्यात तूर डाळीचा दर ९६ रुपये किलो इतका आहे. खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत.

अमित भराटे, किराणा व्यावसायिक

बाजारात फळांची आवक वाढली आहे. थंडीमुळे रसदार फळांना मागणी कमी आहे. मात्र, फळांचे दर वाढलेले आहेत. उन्ह वाढल्यानंतर फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अमोल पेठे, फळविक्रेते