शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

जमिनीच्या वादातून पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:32 AM

लोकमत न्यूज नेटवर्क आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील जेजला येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील जेजला येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पाचजणांवर आंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जेजला येथील बळीराम जगन्नाथ भोसले यांचे १३ मार्च रोजी पत्नीबरोबर शेतीच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ईश्वर ज्ञानोबा देशमुख, परमेश्वर ज्ञानोबा देशमुख, संभाजी भागवत देशमुख (तिघे रा. कंडारी), शहाजी दगडू मोटे (रा. गिरवली) व गंगूबाई बळीराम भोसले यांनी संगनमत करून बळीराम भोसले यांचे हात-पाय दोरीने बांधून दुचाकीवर बसवून राहत्या घरी आणले. याठिकाणी त्यांना काठीने मारहाण केली व कोंडून ठेवले. दरम्यान, हा प्रकार फिर्यादी कालिदास चंद्रकांत भोसले यांना समजला. बळीराम भोसले यांना जबर जखमी करुन घरात कोंडून ठेवल्याची त्यांनी खात्री केल्यानंतर आत जाऊन पाहिले असता, बळीराम हे जागेवरच गतप्राण झाले होते. यानंतर कालिदास भोसले यांनी आंबी पोलीस ठाणे गाठून मयत बळीराम यांच्या पत्नीसह अन्य चारजणांनी मारहाण करुन बळीराम यांचा खून केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर करत आहेत.