शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

२०२३ पूर्वी कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:21 AM

वाशी : २०२३ हे वर्ष संपण्यापूर्वी मतदार संघात कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या योजनेची सर्व कामे मार्गी लावण्यात येतील ...

वाशी : २०२३ हे वर्ष संपण्यापूर्वी मतदार संघात कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याच्या योजनेची सर्व कामे मार्गी लावण्यात येतील व आलेल्या पाण्याचे उद्‌घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. येथील बालाजी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी सामाजिक व न्याय मंत्री धनजंय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी आ. राहुल मोटे, जीवनराव गोरे, महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, नितिन बागल, सक्षणा सलगर, प्रशांत कवडे, दिलीप घोलप, हनुमंत पाटोळे, संतोष पवार, सूर्यकांत सांडसे, विकास पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, २१ टीएमसी पाण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेतील अडथळे दूर करून त्यास मान्यता दिली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कधी, कुठे, काय काम सुरू आहे, त्याची प्रत्येक महिन्याला माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच या योजनेसाठी लागणारा निधी देखील कमी पडू दिला जाणार नाही. दरम्यान, याच कार्यक्रमात मतदार संघातील विविध विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. मतदार संघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राहुल मोटे यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी राहुल मोटे विजयी झाले असते तर ते आज नक्कीच कॅबिनेट मंत्री म्हणून दिसले असते. मात्र, अपयशाने खचून जाण्याची गरज नाही. पैशांचा प्रभाव जास्त काळ राहत नसतो, अशी कोपरखळी मारत आपण माणसे जोडून संघटना बळकट करा. पुढील काळात आपला विजय निश्चित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

चौकट.......

‘एकाच फलकावर किती उद‌्घाटने?’

या परिसंवाद कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबरोबरच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नावे असलेल्या फलकाचे उद्‌घाटन रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यापूर्वीही याच फलकावर इतर पक्षाच्या कार्यक्रमांचे फलक लावण्यात आलेले होते. यामुळे सोशल मीडियावर ‘एकाच फलकावर किती उदघाटने’, अशी चर्चा रंगली होती. वास्तविक सदरील फलक हा भारतीय स्टेट बँकेच्या नावाचा होता. मात्र, विविध पक्षाची नेतेमंडळी याचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.