शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

विमा कंपनी सरकारची जावई आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:34 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाचा २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्केच्या मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे; मात्र यासाठी विमा कंपनी मनमानी करीत आहे. तरीही सरकार गप्पच आहे. ही कंपनी सरकार अन् शिवसेनेचे कृषी मंत्री दादा भुसे यांची जावई आहे का, असा जळजळीत सवाल आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी उपस्थित केला.

जिल्ह्यातील पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना अनुज्ञेय आगाऊ रक्कम देण्याची मागणी आ. पाटील यांनी केली होती. कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या अनुषंगाने आदेश निर्गमित केले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी विभागाने चाचणी प्रयोग केले. त्यात ५० टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्याचा अहवाल २० ऑगस्ट रोजी देणे अपेक्षित असताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अहवालावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला. ही गंभीर बाब कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या निदर्शनास आणून कार्यवाहीची मागणी केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ३० टक्केच नुकसान झाल्याचे लेखी दिल्याचे समजते. यातील ७० टक्केपेक्षा जास्त विमा कंपनीचे प्रतिनिधींचा कृषी अभ्यासक्रमाशी कुठलाही संबंध नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कृषी विभागाच्या अनुभवी अधिकाऱ्यांपेक्षा हे प्रतिनिधींनी या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत का? अग्रिम नुकसान भरपाई तातडीने मिळावी, ही बाधित शेतकऱ्यांची मागणी असताना महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे विमा कंपनीला आपले जावई असल्यासारखे वागणूक का देत आहेत? असा प्रश्नही आ. पाटील यांनी केला. खरीप २०२० चा हक्काचा पीक विमादेखील अशा वर्तनामुळेच प्रलंबित आहे. कळंब तालुक्यातील अशोक गुंड या तरुण शेतकऱ्याने नुकतेच पीक नुकसानामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी तत्काळ विमा कंपनीस अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही आ. पाटील यांनी केली आहे.