शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शिष्यवृत्तीधारकांची थट्टा ; महिन्याकाठी अवघे ८३ रूपये, तेही दोन-दोन वर्ष मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:22 IST

नाममात्र रक्कमही होतकरू विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्ष मिळत नाही

ठळक मुद्देदहा वर्षांपासून शिष्यवृत्तीमध्ये छदामही वाढ नाही 

- बाबूराव चव्हाण 

उस्मानाबाद :  होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लागावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष अनुक्रमे एक हजार व दीड हजार रूपये दिले जातात. यानुसार महिन्याकाठी एका विद्यार्थ्यास देय ८३ ते १२५ रूपये एवढी नाममात्र रक्कमही २०१७ पासून खात्यावर जमा झालेली नाही. विशेष म्हणजे, वर्षागणिक महागाईचा आलेख उंचावत असतानाही सरकारकडून शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ केलेली नाही.

राज्य सरकारच्या वतीने पाचवी आणि ठावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्ष-वर्ष तयारी करतात. दरवर्षी जिल्हाभरातून पाचवी आणि आठवीच्या वर्गातून प्रत्येकी २५६ ते २५७ दरम्यान विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतात. पाचवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सहावी, सातवी आणि आठवीपर्यंत प्रतिवर्ष केवळ १ हजार रूपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या वर्गात असताना शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यास अकरावी पर्यंत वर्षाकाठी दीड हजार रूपये एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. २०१७-२०२० या कालावधीत पाचवी आणि आठवीच्या वर्गातील जिल्हाभरातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. परंतु, मागील दोन ते अडीच वर्षांपासून संबंधित पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचा छदामही जमा झालेला नाही.

पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर जमा होत होती. ही रक्कम विद्यार्थीनिहाय मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होत होती. यानंतर त्यांच्याकडून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना धनादेश देण्यात येत होते. परंतु, सध्या शिष्यवृत्तीचे पैैसे ‘डीबीटी’च्या माध्यामातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम नियमित मिळते की नाही, याची कल्पना खुद्द शिक्षण विभागालाही नाही. २०१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीती मिळालेली नाही. पाचवीच्या विद्यार्थ्यास महिन्याकाठी ८३ ते ८४ रूपये आणि आठवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीधारकास १२५ रूपये एवढी रक्कम देय आहे. एवढी नाममात्र रक्कमही होतकरू विद्यार्थ्यांना दोन-दोन वर्ष मिळत नाही, हे विशेष. राज्य सरकारच्या अशा कार्यपद्धतीसंदर्भात विद्यार्थी, पालकांसह आता शिक्षणप्रेमींतूनही तीव्र प्रतिकीया उमटू लागल्या आहेत. एकीकडे शालेय साहित्याचे दर वर्षागणिक वाढत असतानाही राज्य सरकारने मात्र मागील दहा वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या रक्कमेत एक रूपयानेही वाढ केलेली नाही.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीOsmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी