शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

उस्मानाबाद जिल्ह्यात बावीसशे हेक्टरवरील खरीप पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 6:16 PM

पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन गेली खरडून

उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. बुधवारपर्यंत बावीसशे हेक्टर्सवरील पिके पाण्यात राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे, तसेच पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन खरवडून गेली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस हा अवघ्या दोनच दिवसांत झाला. त्यामुळे बुधवारी सरासरी ओलांडली गेली. जिल्ह्यात आजतागायत एकूण ६१४ मिमी (१०२ टक्के) पाऊस झाला आहे. १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील २,२६२ हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर नदी- ओढ्यांचे पाणी शिरून सुमारे ८८ हेक्टर्स शेती खरवडून गेली आहे.

दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा, तर परंडा तालुक्यात एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सोबतच १३ मोठ्या व १५ लहान पशुधनाचाही मृत्यू झाला आहे. परंडा व भूम तालुक्यात ४ कच्च्या घरांची पडझड प्राथमिक माहितीतून समोर आली आहे. यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

सीना-कोळेगाव तहानलेलाच...

जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने इतर प्रकल्प आता भरत आले आहेत. मात्र, सर्वांत मोठा प्रकल्प असलेला सीना-कोळेगाव अजूनही तहानलेलाच आहे. ५०२ मीटर पूर्ण संचय पाणीपातळी असलेल्या प्रकल्पात आजघडीला उपयुक्त पाणीसाठा केवळ ०.४१ मीटर इतकाच आहे. येथे केवळ ०.४६ टक्के साठा बुधवारी उपलब्ध होता. दरम्यान, निम्न तेरणा व मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने येथील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तेरणामध्ये ७० टक्के, तर मांजरा धरणात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यात आणखी वृद्धी सुरूच आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद