शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

पशुधनाची खरेदी-विक्री बंद; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:29 AM

पाथरुड : खरिपाचा हंगाम अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी खरीपपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू ...

पाथरुड : खरिपाचा हंगाम अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी खरीपपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; परंतु कोरोनाचे संकट याहीवर्षी कायम असल्याने जनावरांचाही बाजार बंद असून, प्रामुख्याने शेतीसाठी लागणारी बैलजोडी खरेदी कुठून करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम आहे.

कोरोनाची दुसरी लाट शहरासह ग्रामीण भागातदेखील वेगाने पसरत आहे. घराघरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, यात अनेकांचे मृत्यूही होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे छोटे-मोठे आठवडी बाजार तसेच जनावरांचे बाजारदेखील बंद आहेत. पावसाळा तोंडावर आला, की शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैलांची गरज असते; परंतु सध्या पशुधनाचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना पशुधन विकणे व घेणे अवघड झाले आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील सर्व कामे होत असली तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. सध्या खरीप हंगाम पंधरा दिवसात सुरू होत आहे; मात्र कोरोनाने मागील दीड वर्षांपासून परिसरातील वालवडसह शेजारील तालुका बाजारपेठ असलेल्या जामखेड येथील जनावरांचा बाजार बंद आहे. त्यातच बैलांची संख्याही कमी असल्याने शेतकऱ्यांना गावोगावी फिरुनच बैलांचा शोध घ्यावा लागत आहे. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांकडूनही बैलांच्या किमती अव्वाच्या सव्वा सांगितल्या जात आहेत. त्यामुळे बैलजोडी घेताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

ट्रॅक्टरचा वापरही आवाक्याबाहेर

दरवर्षी रबीची पेरणी उरकल्यानंतर, तसेच ऊस वाहतूक बंद झाल्यानंतर अनेक शेतकरी आपली बैलजोडी विकतात व पुढील हंगामासाठी बैलांची गरज असल्याने पुन्हा मे महिन्यात खरेदी करतात; मात्र गेल्या दीड वर्षांपासून बैलांचे बाजार बंद असल्याने अगोदर चाळीस ते पन्नास हजार रुपयांना विकलेली बैलजोडी आता दुप्पट किमतीतही मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नवीन बैलजोडी घेताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने एक एकर मोगडणी करायचे म्हटले तर हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची महागडी मशागत शेतीस परवडणारी नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी घेण्यासाठी गावोगावी व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे.

मनपसंत बैलजोडी मिळणे अवघड

बाजारात शेकडो बैलजोड्या पहायला मिळतात. त्यामुळे शेतकरी मनपसंत बैलजोडी निवडतात. विशेषत: खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात बैल खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते; परंतु सध्या कोरोनाने बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विचारणा करावी लागत आहे. शिवाय, शेतकरी अथवा व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असेल ती बैलजोडी अव्वाच्या सव्वा भाव देऊन खरेदी करावी लागत आहे.