शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणाचा तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:24 AM

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल ...

उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल असे, गृहीत धरून कृषी विभागाने बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी सुमारे १८ हजार क्विंटल महाबीज सोयाबीन बियाणे मंजूर झाले होते. यापैकी आजवर उपलब्ध झालेले साडेबारा हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. परिणामी, सध्या बाजरपेठेत हे बियाणे मिळणे कठीण झाले आहे.

नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच मागील एक वर्षापासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले होते. सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल अधिक वाढला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन करू मागणी नोंदविली होती. असे असतानाच गत वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे उत्पादक खाजगी कंपन्यांनी दरामध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, महबीजचे दर जवळपास कायम ठेवले आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या दरात ८०० ते १,००० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा महाबीज सोयाबीन बियाणाकडे कल वाढला आहे. आजवर महाबीजकडून जिल्ह्याला १८ हजार क्विंटलपैकी १२ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे अवघ्या काही दिवसांतच शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे तुलनेने महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे.

चौकट...

६,५०० क्विंटल बियाणाची प्रतीक्षा...

महाबीजकडे सुमारे १८ हजार क्विंटल बियांची मागणी केली होती. आजवर यापैकी साडेबारा हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहे. आणखी साडेसहा हजार क्विंटल बियाणे येणे बाकी आहे. हे बियाणे येणार कधी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

म्हणे, अडीच लाख क्विंटल घरगुती बियाणे...

यंदा वेळेवर आणि मुबलक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. मात्र, बियाणांच्या काही वाणाचा सध्या तुटवडा आहे. असे असे तरी अनेक शेतकरी घरगुती बियाणे पेरणार आहेत, असे ‘कृषी’कडून सांगण्यात आले. असे सुमारे अडीच लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचा दावाही अधिकारी करीत आहेत.

तर उडीद, मूग वाढेल!

जून महिना उजाडताच जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. काहींनी चाड्यावर मूठ धरली आहे. मात्र, अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. हा पाऊस वेळेवर पडल्यास उडीद, मूग या पिकांचा पेराही वाढू शकतो.