शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला

By बाबुराव चव्हाण | Updated: February 15, 2024 14:35 IST

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून घेऊन आंदोलक रस्त्यावर

- बाळासाहेब मानेधाराशिव :मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न-पाणी त्यागले आहे. दिवसागणिक त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. असे असतानाही राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गुरुवारी संतप्त सकल मराठा बांधवांनी बैलगाड्यांसह धाराशिवकडे कूच केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिस यंत्रणेने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन्य मार्गाने वाहने वळवली. दरम्यान, यावेळी मराठा तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरूनजिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मराठा बांधव बैलगाड्यांसह धाराशिव शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी येताना सोबत बैलांसाठी लागणारा चारा आणि रात्री झोपण्यासाठी अंथरून पांघरूनही आणले आहे. जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा बांधवांनी मांडली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील