शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
5
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
6
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
7
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
8
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
9
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
10
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
11
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
12
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
13
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
14
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
15
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
16
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
17
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
18
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
19
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
20
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:21 AM

उस्मानाबाद : राज्य सरकारने ७ मे २०२१ रोजी मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासनाने हा निर्णय ...

उस्मानाबाद : राज्य सरकारने ७ मे २०२१ रोजी मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासनाने हा निर्णय मागे घेऊन मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी राज्यस्तरीय आरक्षण हक्क समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, राज्यातील मागासवर्गीय शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर राज्यातील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली आहेत. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नतीतील आरक्षण देण्यात यावे, म्हणून राज्यातील अनेक संघटनांनी शासनास निवेदनेही दिली आहेत. न्याय देण्याऐवजी राज्य शासनाने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेऊन मागासवर्गीय घटकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विजयकुमार कांबळे, रणजित नरसिंगे, सतीश कुंभार, महादेव केंद्रे, संजीवनी बनसोडे, पी. आर. चंदनशिवे, आर. बी. राऊत, भाग्यश्री ओव्हाळ, संजय ओव्हाळ, प्रदीप पायाळे, सचिन कांबळे, बी. पी. जानराव, एस. टी. धावारे, एस. ए. पांढरे, सुदर्शन ओव्हाळ, कोंडिराम कांबळे, अभयकुमार यादव, एस. व्ही. भालेराव, एस. डी. जेटीथोर, ए. एम. चव्हाण, आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणास पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सहभाग नोंदविला होता.

काय आहेत मागण्या

७ मे २०२१ चा राज्य शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा.

नोकरीतील ४ लाख ५० हजार जागांचा अनुशेष भरण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

मंत्री गटाची पनर्स्थापना करण्यात यावी.

२००६ च्या शिफारशीप्रमाणे ओ.बी.सीं.ना पदोन्नतीत आरक्षण लागू करा. जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र सरकारने केलेले कामगार हितविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. परदेशी शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्नाची अट रद्द करावी.