शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

शेतकऱ्यांचा नादच खुळा! रेशीम विक्रीसाठी पिकअपने गेले अन् पैसे घेऊन विमानाने परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 7:52 PM

पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत.

- बालाजी आडसूळकळंब/वाशी : काळ्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी विमानात बसून ‘हवाई सफर’ करण्याचा योग तसं पाहिलं तर दुर्लभच; परंतु रेशमाच्या कोशाने ‘लखपती’ झालेल्या दोन शेतकऱ्यांनी मात्र मालवाहू पिकअपमध्ये बसून जाताना हजार किलोमीटरचे अंतर कापलं. तर माल विकून येताना चक्क विमानवारी करत आपलं घर गाठलं आहे. डोक्यानं शेती करत उत्पन्न घेणाऱ्या या जोडीनं ‘शेतकरी पण कमी नाहीत’ हेच यातून दाखवून दिले आहे.

पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत. लहरी निसर्गाने शेती ''जुगार'' ठरत असताना, शाश्वत उत्पन्नाचे मार्ग अवलंबत आहेत. यापैकी तुती लागवड आणि त्यापासूनच्या रेशीम कोशाचे उत्पादन घेऊन आपल्या अर्थकारणाला बळकटी देण्यास काहींना यश आले आहे. तालुक्यातील जवळा खुर्दचे बापू नहाणे हे प्रयोगशील रेशीम उत्पादक शेतकरी स्वतः चॉकी सेंटर पण चालवतात. या सेंटरवर सातत्यानं प्रयोगशील शेतकऱ्यांची ये-जा असते. शेतकऱ्यांना बापू नहाणे हे मार्गदर्शनही करतात. याच दरम्यान, नुकताच त्यांच्या शेतात वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील राजेंद्र इदगे व संकेत जावळे यांचा सत्कार आयोजित केला होता. निमित्त होतं ते इदगे व जावळे यांनी चॉकीपासून शंभर टक्के उत्पादन घेत, रेशीम कोशाच्या विक्रीतून आलेल्या पैशातून विमानवारीचे स्वप्न पूर्ण केल्याचे. यावेळी ‘रेशीम एक्स्प्रेस’ म्हणून रामनगर (कर्नाटक) येथे २५१ वी खेप पूर्ण केल्याबद्दल करपे यांचाही सत्कार करण्यात आला.

जाताना पिकअपने, येताना विमानाने...खामकरवाडीच्या राजेंद्र इदगे व संकेत जावळे यांनी यंदाच्या तिसऱ्या लॉटचे रेशीम कोश मालवाहू पिकअपमध्ये घालत हजार किमी अंतरावरील रामनगर (कर्नाटक) गाठले. साडेसहाशेच्या दराने माल विकल्यावर इदगेंना ९० हजार, तर जावळेंना दीड लाख मिळाले. यानंतर त्यांनी परतीचा प्रवास विमानाने करण्याचा निर्णय घेतला अन् एसटीने ९० किमी अंतरावरील बंगलोर शहर गाठले. तेथून सकाळी सव्वासहा वाजता विमानाचे प्रस्थान झाले आणि अवघ्या तासाभरात पुण्यात या शेतकऱ्यांची विमान सफर ‘लँड’ झाली. परत, तेथून एसटीच्या लालपरीने आपलं गाव अन् वावर गाठले.

हौसेला मौल नाही, शेतकरी पण कमी नाहीत...हौसेला मोल नसते म्हणतात. काळ्या वावरात राब राब राबणाऱ्या व एरव्ही दुचाकी, टमटमने, जीपने प्रवास घडणाऱ्या या शेतकऱ्यांची ‘धनिक’ माणसाप्रमाणे एकदा विमानात फिरण्याची मनोधारणा होती. त्यांनी ती आपल्या कष्टाने पूर्णत्वास आणली, असे राजेंद्र इदगे यांनी सांगितले. तर संकेत जावळे यांनी शेतकऱ्यांना कोणी कमी समजू नये, अचूक नियोजन करत डोक्याने शेती व हाताने कष्ट केल्यास शेतकऱ्याची पोरंही नोकरदारांना मागे टाकतात, असे सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद