शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

जलसाठे वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:22 AM

भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा ...

भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. परंतु, तालुक्यातील जलसाठ्यात पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

तालुक्यात खरीप पेरण्यांनंतर १५ दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतित होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगले पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना मान्सून वेळेत सक्रिय झाल्याने प्रत्यक्षात ५१ हजार २०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर पिकाची उगवण होऊन पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल १५ दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ७ जुलैपासून पावसाने वापसी केल्याने तूर्तास खरीप पिकास जीवदान मिळाले आहे. तालुक्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत आंबी मंडळात १७.५०, माणकेश्वर ३६.३०, भूम २९.८०, वालवड ४९.३० तर ईट मंडळात २३ मिमी पावसाची नोंद झाली.

तालुक्यात १ ते १० जुलै या दहा दिवसांत भूम मंडळात सर्वाधिक ८९.४० मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल माणकेश्वर मंडळात ८४.९०, वालवड ७४.८० मिमी, तर अंबी व ईट मंडळात प्रत्येकी ४९.८० मिमी पाऊस झाला आहे. एकूणच अजूनही ईट, वालवड व आंबी मंडळात पावसाचे प्रमाण कमी असून, भूम व माणकेश्वर मंडळात समाधानकारक दिसून येत आहे. शिवाय, तालुक्यातील प्रकल्प अजूनही कोरडे असून, यातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.