शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

यंदा जिल्ह्यात ना टँकर, ना अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:30 AM

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका ...

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका गावातील शिवारात टँकर भरण्यासाठीही जलस्त्राेत उपलब्ध हाेत नव्हते. मात्र, गतवर्षी जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून की काय, यंदा पावसाळा ताेंडावर आला असतानाही एकही टँकर वा जलस्त्राेत अधिग्रहित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावलेली नाही. मे २०२० मध्ये म्हणजेच गतवर्षी १८ टँकर अन् २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले हाेते.

मागील काही वर्षांत उस्मानाबाद बराेबर पाणीटंचाई हे समीकरण निर्माण झाले हाेते. एप्रिल, मे महिन्यात तर टंचाईचे सावट अधिक गडद हाेत असे. वाडी, वस्ती, तांडा तसेच गावागावांतून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड हाेत असे. अशावेळी प्रशासनाला दाेरीवरची कसरत करावी लागत हाेती. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्याच्या सर्वच भागात जाेरदार पाऊस झाला. सीना-काेळेगावसारखे माेठे धरण शंभर टक्के भरले. लहान-माेठे प्रकल्पही ओव्हरफ्लाे झाले हाेते. त्यामुळेच की काय, यंदा जिल्ह्यात ना टँकर सुरू आहे, ना जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले. सध्या जिल्हा टँकरमुक्त आहे. दरम्यान, गतवर्षी याच काळात म्हणजेच मे अखेर १८ टँकर व २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात हाेता. शेजारचे लातूर, नांदेड आदी जिल्ह्यात काही ना काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या उस्मानाबादकरांसाठी ही बाब दिलासा देणारीच म्हटली पाहिजे.

काेट...

जिल्ह्यात मागील वर्षी जाेरदार पाऊस झाला हाेता. त्यामुळे बहुतांश लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळेच यंदा मे महिना सरत आला असला तरी एकही टँकर वा अधिग्रहणाची मागणी नाही. भविष्यात टँकर वा अधिग्रहणांची मागणी झाल्यास तातडीने उपाययाेजना केल्या जातील.

-देवकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.