शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
3
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
4
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
5
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
6
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
7
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
8
अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल
9
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
10
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
11
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
12
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
13
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
14
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
15
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
16
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
17
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
18
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
19
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
20
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी अवघे २३ शिक्षक; आक्रमक पालकांनी झेडपी शाळेला ठोकले टाळे

By बाबुराव चव्हाण | Updated: August 7, 2024 15:33 IST

शिक्षकांसाठी पालक आक्रमक, शाळेला ठाेकले टाळे अन् गावबंदचाही निर्णय

- बाळासाहेब स्वामीईट (जि. धाराशिव) : एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत असताना दुसरीकडे ईट सारख्या गावातील शाळेत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असतानाही पटसंख्येनुसार शाळेला शिक्षक नाहीत. ३६ शिक्षकांची गरज असताना आजघडीला अवघे २३ शिक्षक ज्ञानदान करताहेत. विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान लक्षात घेऊन पालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शिक्षण विभागाने ठाेस कार्यवाही केली नाही. शिक्षण विभागाच्या अशा धाेणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी थेट शाळा गाठून कुलूप ठाेकले. यानंतर गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला.

भूम तालुक्यातील ईट येथे जिल्हा परिषदेची पीएम श्री प्रशाला आहे. या शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी आहेत. एवढेच नाही तर नववी व दहावीसाठी सेमी इंग्रजीही सुरू आहे. सलग दहा वर्षांपासून सेमी इंग्रजीचा निकाल १०० टक्के आहे. एकूणच शाळेच्या गुणवत्तेमुळे प्रत्येक वर्षी पट वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक दिले जात नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीने वेळाेवेळी पाठपुरावा केला. आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या धाेरणाविराेधात मागील तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समिती, स्वाभिमानी युवा ब्रिगेड यांच्या वतीने सयाजी हुंबे यांनी उपाेषण सुरू केले आहे. असे असतानाही शिक्षक मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ‘‘साहेब, आमच्या मुलांना शिकू द्या’’, असे म्हणत पालकांनी बुधवारी सकाळी दहा वाजता शाळा गाठली. शिक्षक नसतील तर मुलांना शाळेत पाठवून उपयाेग काय? असा प्रश्न करीत थेट शाळेला कुलूप ठाेकले. एवढेच नाही, गुरूवारी ईट गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जाेपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, ताेवर माघार नाही असा ठाम निर्धार पालकांनी बाेलून दाखविला. याप्रसंगी संदिपान कोकाटे, विनोद वाडकर, ईश्वर देशमुख, मनोज वाघवकर, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ हुंबे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी, उपाध्यक्ष शितल हुंबे व शेकडो पालक उपस्थित हाेते.

दाेन मुलांसाठी दाेन गुरूजी, मग आमच्यावर अन्याय का?जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी अडचणीत आल्या आहेत. काही ठिकाणी तर दाेन विद्यार्थ्यांसाठी दाेन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, आमच्याकडे साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी ३६ शिक्षक आवश्यक असताना आजघडीला २२ ते २३ कार्यरत आहेत. एवढे कमी शिक्षक असतील, तर गाेरगरीबांची मुले शिकतील कशी, असा सवाल यावेळी पालकांकडून उपस्थित करण्यात आला.

दाेन वर्षांपासून गुरूजी गैरहजरजिल्हा परिषद शाळेवरील एक शिक्षक मागील दाेन वर्षांपासून गैरहजर आहे. कागदाेपत्री हे पद भरलेले दिसते. मात्र, प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. त्यामुळे संबंधित गैहजर शिक्षकाची बदली करून पर्यायी शिक्षक द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

महिला पालकांची लक्षणीय उपस्थितीसकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकांनी शाळा गाठली. यामध्ये पुरूष पालकांसाेबतच महिलांचीही माेठी संख्या हाेती. गाेरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार असेल तर शाळेत मुलं पाठवायची कशासाठी, असा सवालही या पालकांतून करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाOsmanabadउस्मानाबाद