शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेंढीला केवळ ५० पैसे दर; एकरभर कोथिंबिरीत शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

By गणेश कुलकर्णी | Updated: August 19, 2023 15:42 IST

कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण झाली

धाराशिव : एकरभर शेतजमिनीत उत्पादित केलेल्या गावरान कोथिंबीरच्या एका पेंढीला बाजारात पन्नास पैशांचा भाव मिळाल्याने अखेर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भास्कर पवार या शेतकऱ्याने एक एकर कोथिंबीरच्या शेतीवर शनिवारी रोटाव्हेटर फिरवला. यात त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तामलवाडी शिवारात भास्कर पवार यांची शेती असून, त्यांनी आजवर वेगवेगळे प्रयोग करून उत्पादने घेतली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक एकर काळरान जमिनीत गावरान कोथिंबीर बियाण्याची पेरणी केली. तुषार सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन केले, खते फवारणी, पेरणीसाठी ३० हजार रुपयांचा खर्च करून उत्तमरित्या जोपासणी केली. परंतु, कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण होऊन २० ते २५ रुपये दराने विकली जाणारी पेंढी ५० पैशालासुद्धा कोणी व्यापारी विचारेना. यामुळे वाहतूक भाडे, काढणीसाठीचा खर्च आदी खर्चही पदरात पडणार नसल्याने शनिवारी त्यांनी एकरभर हिरव्यागार कोवळ्या कोथिंबिरीत रोटाव्हेटर फिरवला.

लागवडीचा खर्चही पदरात नाही...कोथिंबीरच्या एका पेंढीला ५० पैशांचा भाव बाजारात मिळू लागला आहे. यामुळे उत्पादन तर सोडा लागवडीचा खर्चही पदरात पडत नाही. बाजारात शेतकऱ्याच्या मालाची व्यापारी कवडीमोल दराने मागणी करतात. त्यामुळे अखेर कोथिंबीर शेतीवर रोटाव्हेटर फिरवून ती जमिनीत गाडली. भाव घसरल्यामुळे माझे दोन लाखांचे नुकसान झाले.- भास्कर पवार, शेतकरी, तामलवाडी

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी