शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

गावकऱ्यांचा सहभाग हेच वृक्ष लागवडीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:24 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने वृक्ष लागवड होत आहे आणि काही गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठीचे ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने वृक्ष लागवड होत आहे आणि काही गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामागे गावकऱ्यांचा सहभाग हाच या यशाचा आधारस्तंभ असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले.

वाशी तालुक्यातील पारगाव, दहीफळ, येसवंडी, तेरखेडा, सरमकुंडी तसेच उस्मानाबाद तालुक्यातील आळणी या गावांना भेट देऊन वृक्ष लागवडीची व नियोजनाची पाहणी केली. हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड होण्यामागे जिल्हा प्रशासनाबरोबर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची व आशादायी असणारी आहे, असे फड म्हणाले. यावेळी नागरिकांनी आम्ही लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लावून जगवण्याची हमीही दिली.

डॉ. फड यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, गटविकास अधिकारी खिल्लारे, समृद्धी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, उप -अभियंता, ग्रामसेवक, सरपंच, उप-सरपंच आदी उपस्थित होते.