शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पाणी टंचाईने उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० टक्के आरोग्य केंद्रात प्रसूती ठप्प होण्याच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 20:32 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही

ठळक मुद्देपाण्याच्या ठणठणाट कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांवरही परिणाम

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आणि नाममात्र दरात आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र चालविली जातात. सदरील केंद्रांना डॉक्टरांच्या प्रश्नांसोबतच आता पाणीटंचाईचे चटकेही बसू लागले आहेत. तब्बल ७० टक्के केंद्रात सध्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रसूतींसोबतच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना मात्र, या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही, हे विशेष.

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप तसेच रबी हंगामही हाती लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह अन्य नागरिकांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले आहे. अशा परिस्थित खाजगी दवाखान्या उपचार घेणे ग्रामीण रूग्णांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सर्वसामान्य रूग्णांचा ओढा वाढला आहे. योसाबतच प्रसूती तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाणही जानेवारीपर्यंत उत्तम होते. जानेवारीअखेर २ हजार ९६३ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तजर ३ हजार २६९ प्रसूती झाल्या आहेत. दरम्यान, जानेवारीनंतर टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे विहीर, बोअरसारखे जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत आहे. याचा फटका आता प्राथमिक आरोग्य केंद्रांना बसू लागला आहे.

आजघडीला जिल्हाभरातील ४२ पैैकी ७० टक्क्यांवर आरोग्य केंद्रात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूतींच्या संख्येवर होऊ लागाला आहे. आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भकंती करावी लागत आहे. सध्या भूम, परंडा, वाशी, कळंबसह उस्मानाबाद तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्र पाणी समस्येने हैैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत जि.प. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु, तुर्तास तरी तसे होताना दिसत नाही.

दरम्यान, पाच-सहा वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसूतींसह कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होता. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी हा प्रश्न जिल्हा परिषद  पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला होता. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. ज्या गावात टँकर सुरू आहे, त्याच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. तर जेथे टँकर सुरू नव्हते, अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. अशा पद्धतीने आता टँकरद्वारे आरोग्य केंद्रांना पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन हजारावर शस्त्रक्रिया...एकीकडे शासन कुटुंबकल्याण कार्यक्रमावर भर देत असतानाच दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे याही शस्त्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत भूम तालुक्यातील केंद्रांमध्ये ४४०, कळंब ५२८, लोहारा ५७, उमरगा ३२२, उस्मानाबाद ७२१, परंडा ३०३, तुळजापूर ३५३ आणि वाशी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतर्गत मिळून २३९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सदरील शस्त्रक्रियांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. परंतु, सध्या टंचाई निर्माण झाल्याने शस्त्रक्रियांच्या संख्येवरही परिणाम होवू लागला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादPregnancyप्रेग्नंसीUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदUsmanabad civil hospitalजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद