शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परंडा : तालुक्यात ४ सप्टेंबरपासून सलग तीन ते चार दिवसात पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परंडा : तालुक्यात ४ सप्टेंबरपासून सलग तीन ते चार दिवसात पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. तालुक्यातील खासापुरी, चांदणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेती, फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनुषंगाने बुधवारी तहसीलदार वीर वाबळे यांनी तातडीची बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून सात दिवसांच्या आत नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

मध्यंतरी हात आखडून बसलेल्या पावसाला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तालुक्याच्या परंडा, आसू, जवळा, आनाळा, सोनारी या पाचही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. मुगाच्या शेंगा झडल्या, मोसंबीला गळ लागली, उभी असलेली तूर, ऊस शेतातच आडवे झाले. डाळिंब गळून पडले तर काढलेले उडीद पीक पावसात भिजल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास ६५ टक्के पिकांचे नुकसान झाले असून, पेरणीसाठी केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, तालुक्यातील बाधित पिकांचे पंचनामे करण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार वीर वाबळे यांनी बुधवारी तहसील कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व ग्रामसेवक व तलाठी यांना ई-पीक पाहणी करून, जिओ टॅग फोटोच्या माध्यमातून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या बैठकीला तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे यांच्यासह मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

080921\psx_20210908_150430.jpg

पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेती फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी तहसीलदार वीर वाबळे यांनी तातडीची बैठक घेतली.