शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:22 AM

उस्मानाबाद : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. ...

उस्मानाबाद : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानात धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील ८ हजार ३८५ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्यरेेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. आतापर्यंत गहू, तांदूळ, साखर आणि डाळ आदी खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात. वेळेवर दुकान सुरू राहत नाही. संपूर्ण रेशन वितरित होत नाही. या तक्रारींबरोबरच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. त्यामध्ये रेशन दुकान घरापासून दूर असणे, एकाच रेशन दुकानावर अनेक लाभार्थी जोडल्याने धान्य प्राप्त करण्यास विलंब लागणे यासह काही लाभार्थ्यांना इतर शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या केंद्रातून धान्य उपलब्ध करून घेण्यात येते. जून महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ३८५ लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

प्राधान्य कुटुंब २,१०,१२२

अंत्योदय कुटुंब ३८,७९७

केशरी २२,३९२

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतर होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरातील दुकानात धान्य घेतात. ग्रामीण भागात मोजकेच दुकाने असतात, तर काही ठिकाणी एकच दुकान असते. या गावातील नागरिकांना अन्य दुकानातून पाेर्टेबिलिटीद्वारे धान्य घेता येते. मजूर, कामगार, ऊसतोड मजूर हे मोठ्या प्रमाणात पोर्टेबिलिटीच्या साहाय्याने धान्य घेत आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मे, जून महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. यात प्राधान्य कुटुंब अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत धान्य वितरित करण्यात येणार आहे. प्राधान्य व अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ व २ किलो गहू वितरित केले जात आहेत.

कोणत्या तालुक्यात कितीजणांनी बदलला दुकानदार

भूम ३९०

कळंब १,०४०

लोहारा ७६७

उमरगा ८०४

उस्मानाबाद १,३७१

परंडा १,६७४

तुळजापूर १,७८६

वाशी ६१३