शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

दहा एकर उडदात फिरविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:31 AM

जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद ...

जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद पिकात लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील एका शेतकऱ्याने चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन बसला.

जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाच्या आगमनाने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पावसावर जेवळी व परिसरात साधारण वीस टक्के पेरणी झाली. मात्र, कमी ओलीमुळे ८० टक्के शेतकरी जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसानंतर पेरणी केली. पेरणीयोग्य पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, हा आनंद शेतकऱ्यांना फार काळ राहिला नाही. जुलै महिन्यातील दमदार आगमनानंतर पावसाने महिनाभरापासून या परिसरात चक्क दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पिके रानात जागेवर करपून गेली.

नगदी पीक असलेल्या उडीद पिकावरील शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसत असल्याने उत्तर जेवळी येथील शेतकरी कल्याणी संभाजी घोडके यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रावर असलेल्या उडीद पिकात चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. यामुळे शेतकऱ्यांला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कोट.......

दहा एकर क्षेत्रावर जुलैमध्ये उडदाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांचे कंबरडे मोडले. तब्बल महिना होवून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे फुलांच्या मोसमात संपूर्ण फुलगळ होऊन दोन-चार शेंगा आहेत. त्याची रास करणे परवडणारे नाही. पुढील होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण उडीद पिकावरती रोटाव्हेटर मारावे लागले.

- कल्याणी संभाजी घोडके, शेतकरी