शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

विमा कंपन्या अन् केंद्राचीच सेटलमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:35 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषिमंत्री दादा भुसे यांनी ३० ऑगस्ट रोजी ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषिमंत्री दादा भुसे यांनी ३० ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे अधिकाऱ्यांना आधीच सूचित केले आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्याच बाजूने असून, उलट केंद्र सरकार व विमा कंपन्यांचेच साटेलोटे असल्याचा आरोप खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला. त्यामुळे खरिपाची पिके वाळली आहेत. या अनुषंगाने ही बाब कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर महसूल, कृषी विभाग व पीक विमा प्रतिनिधींमार्फत चाचणी प्रयोग केले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी दादा भुसे यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आमदार कैलास पाटील यांच्यासमवेत भेट घेतली. त्यांनी कृषी आयुक्त व सचिवांना तात्काळ बैठक लावावी, असे आदेश दिले. त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बैठक होत आहे. यातून पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार असल्याचे खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

खाजगी कंपन्या, केंद्राचा आशीर्वाद...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सुरुवातीला सरकारी कंपन्या होत्या. मात्र, नंतर खाजगी कंपन्यांचा सहभाग केंद्र सरकारच्या आशीर्वादाने वाढवला आहे. सोबत तीन वर्षांचा करार केला आहे. राज्य सरकारनेदेखील खाजगी पीक विमा कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरीही केंद्र सरकार पीक विमा कंपनीची पाठराखण करून कंपन्यांना अभय देत असल्याचा आरोप करून विमा कंपन्या कोणाच्या जावई आहेत, हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक असल्याचे खा. राजेनिंबाळकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करण्याऐवजी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे खा. राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी सांगितले.