शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल

By सूरज पाचपिंडे  | Published: September 04, 2023 6:59 PM

आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

धाराशिव : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व विनाखंड वीजपुरवठा हाेत नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके करपून चालली आहेत. राज्य सरकार आणि महावितरणच्या विराेधात सोमवारी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पाण्याविना पिके करपून लागली आहेत. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहेत. परंतु त्यांना महावितरण साथ देत नाही. कृषीपंपांना उच्च दाबाने वीज मिळत नाही. काही भागात तर एक दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. त्यातही लपंडाव आलाच. असे असतानाही राज्य सरकार या प्रश्नावर बाेलायला तयार नाही. परिणामी, शेतकरी हताश झाले आहेत. सरकार आणि महावितरणच्या विराेधात शिवसेनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमाेर हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासन व महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार टिका केली.

जिल्ह्यात कुठंच आठ तास लाईट मिळत नाही. पिके वाळून चालली आहेत. शेतकरी लाईनमनला फोन करतात, मात्र ते फोन उचलल नाहीत. एक वर्ष झाली तरी नवीन सबस्टेशनचे टेंडर मंजूर झाले नाहीत. ऑईल अभावी डीपी बसविला जात नाही. त्यामुळे पीके करपू लागली आहेत. महावितरणने त्वरीत टेंडर काढून नवीन सबस्टेशन सुरु करावीत, तसेच शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरठा करावा, यापुढे शांततेत नाही तर रुमणे घेऊन आंदोलन करु असा, इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, साेमनाथ गुरव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद