शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याने अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला!

By बाबुराव चव्हाण | Published: May 06, 2023 3:58 PM

सांगवीतील शेतकरी हवालदिल; चार ते पाच रुपये किलाे दराने विकण्याची नामुष्की

तामलवाडी ( धाराशिव) : बाजारपेठेत कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. चार ते पाच रुपये किलाे एवढा अत्यल्प दर मिळत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून काढणी आणि काटणीचाही खर्च निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शेतकऱ्याने सुमारे दाेन एकरातील कांदा पिकावर कुळव फिरवून अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला.

शेतकरी ज्ञानदेव भानुदास मगर यांची सोलापूर- धुळे महामार्गालगत सांगवी काटी शिवारात शेतजमीन आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांनी दोन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली हाेती. कांदा काढणीला येईपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला. मात्र, कांदा बाजारपेठेत दाखल हाेताच दर काेसळले. सध्या प्रति किलाे चार ते पाच रुपये एवढा अत्यल्प दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून कांद्याची काढणी व काटणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मगर यांनी सुमारे दाेन एकर क्षेत्रातील पिकावर कुळव फिरवून थाेडाथाेडका नव्हे तर अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला. दरम्यान, सांगवी शिवारातील अन्य शेतकरीही हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि उष्णतेमुळे काढणी झालेला कांदाही खराब हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बाजारात दर मिळत नाही आणि दुसरीकडे कांदा टिकतही नसल्याने शेतकऱ्यांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला आहे.

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही...शेतकरी ज्ञानदेव मगर यांनी दाेन एकरातील कांदा पिकावर सुमारे ६० हजार रुपये खर्च केला. मात्र, बाजारपेठेत दर मिळत नसल्याने त्यांनी हा कांदा शेतातील मातीत गाडला. पदरमाेड हाेऊनही हाती दमडीही पडली नसल्याने शेतकरी मगर हवालदिल झाले आहेत. अशीच काहीशी अवस्था गावातील अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

ना अनुदान, ना मदत...कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान बाजारात विक्री झालेल्या कांद्यासाठीच लागू आहे. मात्र, दुसरीकडे काढलेला कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही हाती पडत नसल्याने शेतकरी कांदा जमिनीत गाडू लागले आहेत. अशा शेतकऱ्यांना काेण मदत देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादagricultureशेतीonionकांदा