शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:19 AM

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात ...

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश नागरिकांकडूनच एस.टी. बसऐवजी ट्रॅव्हल्सचीच निवड करण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकाटामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूक देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एस.टी. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सलाच जास्त पसंती देत आहेत. एस.टी.पेक्षा टॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याचा समज निर्माण होत आहे.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला स्पीड लॉक करण्यात आला आहे. यामुळे इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी बसचे अपघात नसल्यासारखे आहेत. एसटीचा प्रवास खरोखरच सुरक्षित प्रवास आहे.

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनधारकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने पळविल्या जातात. यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यातून अनेकांना जीव गमवाला लागतो. मृताच्या कुटुंबीयाला कुठलीही नुकसानभरपाई दिली जात नाही.

अनेक एस.टी. बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असली तरी एसटीतून प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. प्रवास आरामदायक व्हावा याकरिता ट्रॅव्हल्समधून प्रवासाला पसंती देतात. मात्र, आरामापेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. यामुळे एसटीतून प्रवासाला अधिक पसंती देतो. दररोज एसटीने अपडाऊन करतो.

श्रीकांत धावारे, प्रवासी.

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. याउलट ट्रॅव्हल्सचे चालक हे सातत्याने बदलत असून, त्यांना कुठलेही प्रशिक्षण नसते. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणे टाळत असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. अपवादात्मक परिस्थितीतच ट्रॅव्हल्समधून प्रवास करतो. आरामापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. एसटी अपघात झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते.

किशोर गायकवाड, प्रवासी.

कोट...

खासगी वाहतुकीच्या तुलनेत बसचा प्रवास सुरक्षित आहे. अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. शिवाय अपघात मृत्यू पडलेल्या व जखमींना नुकसानभरपाई दिली जात असते. आरामदायी प्रवासासाठी सिटर कम स्लिपर, शिवशाही बसेसही प्रवाशांच्या सेवेत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्यावर महामंडळाचा अधिक भर असतो.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद.