शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

राज्याने झटकले हात, मग रेल्वे येणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:28 AM

६० वर्षांहून अधिक जुनी मागणी असलेल्या रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्या होत्या. २०१९ मध्ये या मार्गाला ...

६० वर्षांहून अधिक जुनी मागणी असलेल्या रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्या होत्या. २०१९ मध्ये या मार्गाला मंजुरी मिळाली. तत्पूर्वी महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन राज्य सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के निधीचा वाटा उचलण्याची हमी दिली होती. तत्कालीन प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांना राज्य सरकार निम्मा खर्च उचलण्यास तयार असल्याची माहिती पत्रान्वये कळविली होती. ही संमती मिळताच रेल्वेच्या बांधकाम विभागाचे संचालक धनंजय सिंह यांनी ८ जानेवारी रोजी मुंबई मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना या मार्गाला मंजुरी मिळाल्याचे कळविले. दरम्यान, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग ८० किलोमीटर अंतराचा असून, त्यासाठी ९०४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी नसली तरी २० कोटींची तरतूद केली आहे. मात्र,राज्याने आता हात झटकल्याने हा प्रकल्प अधांतरी लटकण्याची चिन्हे आहेत.

म्हणे, निधीचा प्रश्नच उद्भवत नाही...

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील व आ. सुभाष देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रकल्प पूर्णत: केंद्राच्या आर्थिक सहभागाने केला जाणार असल्याने राज्याने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठासून सांगितले. मग राज्याच्याच प्रधान सचिवांनी २०१९ मध्ये वाटा स्विकारण्याची तयारी असल्याचे दिलेले ते पत्र खोटे होते की परब यांचे उत्तर, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, परब खोटे बोलत असल्याचा दावा करीत आ.पाटील व आ.देशमुख हे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे सांगत आहेत.

रेल्वेच्याही उंटावरुन शेळ्या...

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या प्रकल्पावरील संनियत्रण आधी पुण्यातील रेल्वेच्या अधिका-यांकडे होते. मात्र, वर्षभरापूर्वी अचानक हे संनियंत्रण भुसावळ येथील अधिका-यांकडे सोपविण्यात आले आहे. यानंतर लागलीच खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी बोलाविलेल्या एका बैठकीस भुसावळहून धापा टाकत आलेले अधिकारी या प्रकल्पाच्या कामाला कितपत गती देऊ शकतील, याविषयी शंकाच आहे.