शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
5
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
6
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
8
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
9
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
10
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
11
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
12
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
13
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
14
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
16
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
17
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
19
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
20
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:26 AM

उमरगा : ठाकरे सरकारच्या सर्व योजना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्याच असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कर्जमाफी, कोरोना ...

उमरगा : ठाकरे सरकारच्या सर्व योजना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्याच असून, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन कर्जमाफी, कोरोना काळातील कार्य, परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान, गरजूंसाठी शिवभोजन आदींची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. गावातील किती नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले, याची माहिती संकलित करून जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. उमरगा-लोहारा तालुक्यातील या अभियानाचा समारोप शनिवारी कोराळ येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात युवा सेनेच्या ५१ शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार कोराळ येथे युवा सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमास किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहियोद्दिन सुलतान, शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, विभागप्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, विभागप्रमुख विलास भगत, प्रदीप मदने, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, उपतालुकाप्रमुख संदीप जगताप, शिवसेना विभागप्रमुख खयूम चाकूरे, प्रवीण गोरे, व्यंकट कवठे, प्रशांत पोचापुरे, किरण दासमे, बाबू शेख, श्याम माडजे, विक्रम दासमे, अशोक पवार, प्रकाश जंगाले, बालाजी सुरवसे महाराज, धनराज गाडेकर, दत्ता दासमे, दगडू जंगाले, दिलीप येडगे, महादेव बिराजदार, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात, शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा सन्मान

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संपन्न होणारा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मागील दोन वर्षे कोरोना आजारामुळे खंडित झाला आहे. यामुळे गतवर्षी व यंदा गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात, शाळेत जाऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यानुसार शनिवारी कोराळ येथील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.