शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात

By बाबुराव चव्हाण | Published: January 15, 2024 7:05 PM

सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे.

धाराशिव : एकीकडे शेतीमालाचे भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींना आयातीस मुभा दिली जाते. आणि दुसरीकडे उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर साेडले जाते. सरकारच्या अशा शेतकरी विराेधी धाेरणामुळेच बळीराजा अडचणीत आला आहे. आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मागील अडीच वर्षांच्या तुलनेत वर्षभरात अडीच टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले आहेत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघात केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर माेर्चा काढण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, आज सोयाबीनला भाव मिळत नाही. दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशातील ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. पाम तेलाची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. आणि साेयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला माेठा फटका बसला. सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे. तर, उद्याेगपती श्रीमंत, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जेवढी कर्जमाफी ६५ टक्के शेतकऱ्यांना दिली, त्या तुलनेत १ टक्का असलेल्या उद्याेगपतींना मात्र, १० पट कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे आता या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचा सातबारा काेरा झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी