शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

उस्मानाबादकरांसाठी खुशखबर; दमदार पावसाने जिल्ह्याचा भूजल स्तर १.६९ मीटरने वाढला

By सूरज पाचपिंडे  | Published: October 15, 2022 5:32 PM

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे.

- सूरज पाचपिंडेउस्मानाबाद  : मागील तीन चार वर्षापासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची भूजल पातळी १.६९ मीटरने वाढली आहे. 

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात पाऊस कमी प्रमाणात झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात पाऊस पडत होता. ऑगस्ट महिन्यात अधूनमधून पाऊस पडत राहिला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस पडत आहे. काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, ओढे, नालेही प्रवाहित झाले होते. शिवाय, भूजलाचे पुनर्भरण झाले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल स्तर सरासरी १.६९ मीटरने वाढला आहे. जिल्ह्यात ऊस पिकांसह बागायती व फळ पिकांकरिता काही तालुक्यांमध्ये पाण्याचा अमर्याद उपसा होत असतो. मात्र, तीन वर्षापासून काही तालुक्यांमध्ये झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पाेषक ठरला आहे.

११४ निरीक्षण विहिरींची तपासली पातळीभूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यातील ११४ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. ऑक्टोबर महिन्यात भूजल  स्तर २.१८ मीटरने वर आल्याचे समोर आले. 

तालुकानिहाय भूजल पातळीत झालेली वाढतालुका      भूजल पातळीत वाढभूम           २.५७कळंब       ०.५९लोहारा      १.८१उमरगा      २.०२उस्मानाबाद  १.६६परंडा        २.५०तुळजापूर    १.२३वाशी         १.२१

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादRainपाऊसWaterपाणी