शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:31 AM

कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील हावरगाव येथील कारखान्यास साखर गहाण ठेवून ४६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही साखर परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तीन बँक अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली.

कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. त्यामुळे कारखान्याकडील साखर ही परळी बँकेच्या ताब्यात होती. मात्र, २०१७-१८ साली ही साखर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. साखर कारखान्याचे पदाधिकारी व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा ठपका ठेवत चेअरमन दिलीप आपेटसह जवळपास ४० जणांविरुद्ध याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. 

उपाधीक्षक अंजुम शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आपेट याच्यासह सहाजणांना यापूर्वीच अटक झालेली आहे. दरम्यान, तपास सुरू असताना या गुन्ह्यात सहभाग आढळून आलेल्या आणखी तीन बँक अधिकाऱ्यांना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे. यामध्ये परळी बँकेचे संपत साबळे, रोहिदास घोडके व अन्य एका बँकेचे नीलेश देशपांडे यांचा समावेश आहे. त्यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने या तिघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद