शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

...तर जिल्ह्यातील ६०८ गावांत सुरू हाेणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:21 AM

उस्मानाबाद : काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

उस्मानाबाद : काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणेला केल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडूनही काेराेनामुक्त गावांचा आढावा घेतला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावांमध्ये आजघडीला एकही व्यक्ती काेराेनाबाधित नाही. त्यामुळे शासनाचा सकारात्मक निर्णय झाल्यास काेराेनामुक्त गावांतील शाळा सुरू हाेऊ शकतात.

काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने आठवी ते बारावीदरम्यानचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले हाेते. या शाळा सुरळीत हाेत असतानाच काेराेनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र स्वरूपाची असल्या कारणाने शासनाने पुन्हा शाळा बंद केल्या. मागील काही महिन्यांच्या तुलनेत काेराेना संसर्गाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानचे वर्ग सुरू करता येऊ शकतात का, याचा आढावा घेण्याची सूचना जिल्हास्तरीय यंत्रणांना केली हाेती. त्यानुसार शिक्षण विभागही कामाला लागला आहे. गावनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आजघडीला जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावे अशी आहेत, जिथे काेराेनाचा एकही रुग्ण नाही. म्हणजेच ही सर्व गावे काेराेनामुक्त आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाचा हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सुमारे ६०८ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजू शकते.

चाैकट...

१,४८७

जिल्ह्यातील एकूण शाळा

१,०७९

जिल्हा परिषद शाळा

२७०

अनुदानित शाळा

३९

अंशत अनुदानित

काेणत्या वर्गात किती विद्यार्थी

२५,६६५

पाचवी

२६,०३७

सहावी

२५,५४७

सातवी

२५,२२४

आठवी

७,०२१

जिल्ह्यातील एकूण गावे

६०८

सध्या काेराेनामुक्त असलेली गावे

तालुकानिहाय काेराेनामुक्त गावे

लाेहारा २९

उमरगा ९०

कळंब ७८

उस्मानाबाद ११७

तुळजापूर १०४

वाशी ३२

भूम ७२

परंडा ८६

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये सध्या काेराेनाचा एकही रुग्ण नाही, अशा गावांचा आढावा घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या हाेत्या. त्यानुसार आपल्याकडे सहाशेपेक्षा अधिक गावे काेराेनामुक्त आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळविली जाणार आहे.

- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.