शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 12:41 PM

छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत.

उस्मानाबाद : उन्हाच्या पर्यायासोबतच माणसांच्या डोक्याचा पाराही हल्ली चांगलाच वाढलेला दिसत आहे. छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत. यातूनच उस्मानाबाद जिल्ह्यात मागील महिनाभरात तब्बल ८ जणांचा खून झालेला आहे.

पती-पत्नीत चालणारी कुरबूर नवी नाही; पण या कुरबुरीतून रांजणी येथील मंगल विठ्ठल संगापुरे या महिलेचा त्यांच्या पतीनेच कोयत्याने वार करून खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला. सतत मद्यपान करणाऱ्या पित्यासोबत झालेल्या वादानंतर मुलानेच डोक्यात दगड घालून कोथळा येथील अच्युत भागवत शिंदे यांचा खून केला. भातागळी येथील अक्षय जयवंत जगताप या २५ वर्षीय तरुणाचा घरगुती वादातून तिघांनी मारहाण करुन खून केल्याचा प्रकारही गत महिन्यातच समोर आला. करवंजी येथील प्रभावती भीमराव बेडगे या महिलेचाही जुन्या वादातून कोयत्याने वार करून खून झाला. किरकोळ वादातून मांडवा येथील युवराज त्रिंबक पाटील यांचा गळा आवळून खून करीत प्रेत तलावात फेकून दिल्याची घटना गावातील एका व्यक्तीने घडवून आणली. 

गावातीलच मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून गुंजोटी येथील जावेद सिराज काझी या तरुणाचा खून झाल्याचा आरोपही मागच्याच महिन्यात झाला होता. परभणी जिल्ह्यातील संजय नामदेव गायकवाड यांचा खून करून त्यांचा मृतदेह ढोकी-तेर रस्त्यालगत टाकून देण्यात आला. तर ढोकी येथील कृष्णा शिवशंकर कोरे या २३ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी खून करून त्याचा मृतदेह गडदेवदरीजवळ गवतात फेकून दिला. या घटना लक्षात घेता जवळपास तीन ते चार दिवसांआड उस्मानाबाद जिल्ह्यात एकाचा खून होत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद