शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

तुळजापूर, कळंब तालुक्यांना जानेवारीतच पाणी ‘टंचाई’च्या झळा !

By राजकुमार जोंधळे | Published: January 10, 2024 4:48 PM

७८ गावांची तहान अधिग्रहणावर : २३ काेटींचा टंचाई कृती आरखडा...

धाराशिव : जिल्ह्यातील आठही तालुक्यांना जानेवारीतच टंचाईच्या ‘झळा’ सहन कराव्या लागत आहेत. तुळजापूर अन् कळंब तालुक्यांतील गावे टंचाईने सर्वाधिक ‘बेजार’ आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण ७८ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान जाणवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी १,८८८ उपाययाेजनांची आखणी केली आहे. त्यासाठी २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत टंचाईग्रस्त गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास २५० टॅंकरची गरज भासणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा आखला आहे. ज्या गावांच्या घशाला काेरड पडली आहे, अशांसाठी तातडीने उपाययाेजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दाेन तालुक्यांची पाण्यासाठी भटकंती...धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि कळंब तालुक्यांची घाेटभर पाण्यासाठी हिवाळ्यातच भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक तुळजापूर - ३२ आणि कळंब तालुक्यात २८ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वाशी-परंडा प्रत्येकी १, धाराशिव-भूम प्रत्येकी २, लाेहारा - ८ आणि उमरगा तालुका ४ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

टंचाई निवाराणासाठी १ हजार ८८८ याेजना...टंचाईग्रस्त गावांसाठी नऊ प्रकारच्या उपाययाेजनांची आखणी केली असून, यात बुडक्या घेणे - ७, विहिरीतील गाळ काढणे - २७, खासगी विहिरींचे अधिग्रहण - १ हजार ८८, टॅंकर, बैलगाडीने पाणीपुरवठा - ४९३, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा याेजनांची कामे पूर्ण करणे - ०, नळयाेजनेची दुरुस्ती - १, विंधन विहिरींची दुरुस्ती - ४६, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका - १८१ आणि तात्पुरत्या ४५ पूरक नळयाेजनांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील टंचाईवर २३ काेटींचा हाेईल खर्च...जिल्ह्यातील संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा खर्च केला जाणार आहे. यात खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी - ५ काेटी ३६ लाख ३ हजार; टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९ काेटी ६६ लाख १ हजार; नवीन विंधन विहिरी घेणे, कूपनलिकेसाठी २ काेटी ५२ लाख ५० हजार आणि तात्पुरत्या पूरक नळयाेजनांसाठी ४ काेटी ५६ लाख ९१ हजारांची तरतूद आहे.

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबाद