शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

विहीरीच्या पाण्यासाठी दोन गटात तूफान राडा, एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Updated: January 6, 2025 12:13 IST

वाशी तालुक्यातील बावी येथे दोन गटात विहिरीतील पाणी घेण्यावरुन वाद होता.

धाराशिव : शेताला विहिरीतील पाणी देण्याच्या कारणावरुन बावी येथे दोन गटात तुफान राडा झाला. कत्ती-कोयत्याने जबर मारहाण झाल्याने एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

वाशी तालुक्यातील बावी येथे पारधी समाजातील दोन गटात विहिरीतील पाणी घेण्यावरुन वाद होता. रविवारी सायंकाळी हा वाद पुन्हा पेटला. दरम्यान, बाचाबाचीनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांच्या कत्ती-कोयते, दगड, काठीने जबर हाणामारी झाली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा वाशी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांना धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येथे आणखी एकजण मृत्यूमुखी पडला. चौथ्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

मयतामध्ये आप्पा भाऊ काळे, परमेश्वर आप्पा काळे, सुनिल परमेश्वर काळे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच येरमाळा ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयित म्हणून जवळपास १० जणांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिवDeathमृत्यू