शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उस्मानाबादेत फिर वही दिल लाया हूँ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:06 IST

भाऊबंदकीची लढत । पुन्हा वैयक्तिक टीकेवर भर; मतदारांच्या मुद्द्यांपासून प्रचार दूरच

उस्मानाबाद मतदारसंघात पाटील-राजेनिंबाळकर घराण्यात चुरशीची लढत होत आहे. या कुटुंबातील पारंपरिक वैर प्रचारात प्रतिबिंबित होत असून, कार्यकर्ते अजूनही मतदारांच्या मुद्यांवर यायला तयार नाहीत. या दोघांत झालेल्या मागच्या दोन विधानसभा निवडणुका या वैयक्तिक संघर्षावरच झाल्या होत्या. आता लोकसभेला आमनेसामने आल्यानंतरही पुन्हा तेच घडू पाहतेय.

राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह पाटील, तर शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आमनेसामने आहेत. तसे नात्याने हे दोघे चुलतभाऊच. मात्र, मागच्या पिढीतून आलेल्या वैमनस्याचा वारसा अजूनही तितक्याच त्वेषाने त्यांच्याकडून जपला जात आहे़ डॉ़ पद्मसिंह पाटील व पवनसिंह राजेनिंबाळकर या सख्ख्या चुलत भावांत वितुष्ट आल्यानंतर हे दोघे २००४ च्या विधानसभेला पहिल्यांदा आमनेसामने आले होते. पुढे पवनराजेंची हत्या झाल्यानंतर या कुटुंबातील वैर पुढच्या पिढीने जपले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती येत आहे.

एकाच दिवशी दोघांचीही उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवसापासूनच त्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले आहेत. असभ्य भाषेचा वापर करीत त्यांच्यात 'कार्टून स्ट्राईक' सुरू आहे. तप उलटले तरी निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा तेरणा कारखाना अन जिल्हा बँकच राहिला आहे. तो कोणी व कसा बुडविला, यावर कार्टुनद्वारे भाष्य सुरू आहे. या चिखलफेकीचे शिंतोडे थेट उमेदवारांवरच उडताना दिसत आहेत. 'एकास दोन' या समीकरणानुसार एक बाजूने एक कार्टून प्रसृत झाले की दुसरीकडून उत्तरादाखल दोन कार्टून 'लॉन्च' होताहेत. या दोघांच्या लढाईत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. घराणेशाहीचा आरोप करीत वंचितांच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांच्याकडून प्रचारात केले जात आहे. उमेदवार अर्जुन सलगर प्रचारात व्यस्त असले तरी त्यांची बरीचशी भिस्त ही प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी यांच्यावरच दिसून येते. सोबतच बसपानेही डॉ. शिवाजी ओमन यांना रिंगणात उतरविले आहे.

मित्रपक्षांच्या 'नेकीं'वर बरेचसे अवलंबून...

सेना-काँग्रेस अन् राष्ट्रवादी-भाजप, अशी आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांत पाहायला मिळाली़ मात्र, या अभद्र आघाड्या आता तोडायच्या असे ठरले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची व भाजपची ताकद बेदखल करावी अशी निश्चितच नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार मित्रपक्षाच्या मदतीवर बरेचसे विसंबून आहेत. आजवरचा अनुभव पाहता मित्रपक्षांची ही नेकी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.वैयक्तिक टीका-टिपण्या हा आपला अजेंडा नाही़ आम्ही आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात जिल्ह्यात जी काही विकासकामे झाली आहेत त्यावर व भविष्यात जी विकासकामे आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून करु शकतो, रोजगार मिळवू शकतो, यावरच भर देत आहोत़- राणा पाटील, राकॉदीर्घकाळ सत्तेत राहूनही जिल्ह्याचा विरोधकांनी विकास केला नाही़ ही बाब प्रकर्षाने मांडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसामान्यांसाठी असलेली धोरणे, राष्ट्राभिमान तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकरी, सामान्यांप्रती असलेली ठाम भूमिका व त्यांच्या नजरेतील विकास घेऊन मतदारांसमोर जात आहोत़- ओम राजेनिंबाळकर, सेनाप्रमुख उमेदवारराणा पाटील । राकॉओम राजेनिंबाळकर । सेनाअर्जुन सलगर। वंचित आघाडीकळीचे मुद्देउस्मानाबाद मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प नाही़ रोजगारासाठी तरुणांना पुणे-मुंबईची वाट धरावी लागते़शेतकरी आत्महत्येत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे़ त्यांच्यासाठी ठोस उपाय योजना अंमलात आणली जात नाही़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादosmanabad-pcउस्मानाबाद