शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 19:43 IST

पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनात सेंद्रीय शेतीची पेरणी करुन कारागृह प्रशासन विषमुक्त अन्नधान्य अन् समाज उगवू पाहत आहे़

ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्हा कारागृहाकडे एकूण १७ एकर ३० गुंठे जमीन आहे़ त्यापैकी ९ एकर १३ गुंठे जमीन शेतीसाठी वापरात आणली गेली आहे़या शेतीतून प्रामुख्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यासाठी कुठल्याही रासायनिक खत, औषधीचा वापर केला जात नाही़सध्या येथील शेतीत पत्ताकोबी, बटाटे, टोमॅटो, वांगी, भोपळा, मुळा, डांगर, शेवगा, ज्वारी, मका आदी पिकांची लावण करण्यात आली आहे़

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनात सेंद्रीय शेतीची पेरणी करुन कारागृह प्रशासन विषमुक्त अन्नधान्य अन् समाज उगवू पाहत आहे़

उस्मानाबाद जिल्हा कारागृहाकडे एकूण १७ एकर ३० गुंठे जमीन आहे़ त्यापैकी ९ एकर १३ गुंठे जमीन शेतीसाठी वापरात आणली गेली आहे़ भरमसाठ रासायनिक खते, औषधी वापरलेल्या अन्नधान्य-भाजीपाल्यातून मानवी शरिरात निर्माण होणार्‍या व्याधी लक्षात घेत कारागृह अधीक्षक एस़सी़ भगुरे यांच्या संकल्पनेतून येथील शेती सेंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यासाठी एका कृषी सहायकाची नियुक्तीही याठिकाणी करण्यात आलेली आहे़ कारागृह परिसरात शेतीसाठी घेण्यात आलेल्या विहीर व बोअरला मुबलक पाणी उपलब्ध असते़ त्यामुळे संपूर्ण शेती बारमाही पाण्याखाली आहे़ या शेतीतून प्रामुख्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यासाठी कुठल्याही रासायनिक खत, औषधीचा वापर केला जात नाही़ सेंद्रीय खत, औषधींचा वापर करुन पिके वाढविली जात आहेत़

सध्या येथील शेतीत पत्ताकोबी, बटाटे, टोमॅटो, वांगी, भोपळा, मुळा, डांगर, शेवगा, ज्वारी, मका आदी पिकांची लावण करण्यात आली आहे़ या सेंद्रीय शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला कारागृहातील कैद्यांसाठीच वापरला जातो़ जर उत्पादन जास्त झाले तर हा भाजीपाला शेजारच्या सोलापूर, लातूर येथील कारागृहांना पुरविला जात आहे़ उस्मानाबादच्या कारागृहात सरासरी दोनशे ते सव्वादोनशे कच्चे व शिक्षा झालेले कैदी असतात़ त्यांना विषमुक्त शेतीतून तयार झालेला पोषक आहार सध्या मिळायला लागला आहे़ शिक्षा झालेल्या कैद्यांनाच शेतीकाम दिले जाते़ त्यामुळे त्यांना सेंद्रीय शेतीचे धडेही येथून गिरवायला मिळत आहेत़ म्हणूनच उस्मानाबादची ही बंदीशाळा जणू कैद्यांसाठी विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा बनली आहे़

कैदी रमले शेतीत़़

वेगवेगळ्या गुन्ह्यात बंदीवास भोगत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांकडे घरची शेती आहे़ हे दोघेही कारागृहातील सेंद्रीय शेतीत चांगलेच रमले आहेत़ बंदीवासातून बाहेर पडल्यानंतर आपण घरची शेतीही अशाच पद्धतीने विकसित करुन सन्मानाचे जीवन व्यतीत करणार असल्याचे ते म्हणाले़

सेंद्रीय खताची निर्मिती़

कारागृह प्रशासनाकडे शेती कसण्यासाठी दोन बैल, एक ट्रॅक्टर आहे़ बैलांचे शेण तसेच कैद्यांकडून राहिलेल्या अन्नाचा वापर करुन सेंद्रीय खताची निर्मिती कारागृह परिसरातच करण्यात येत आहे़ हे खत पुरेसे ठरते़ फवारणीसाठी सेंद्रीय औषधी मात्र विकत आणावी लागते, अशी माहिती वरिष्ठ तुरुंगाधिकारी डी़एस़ इगवे यांनी सांगितले़

सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्ऩ़़

कारागृहातील कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी नियमित वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात़ बंदीवासातून बाहेर पडल्यानंतर सन्मानाचे जीवन त्यांना जगता यावे, यासाठी सेंद्रीय शेती, दुग्धव्यवसाय, उद्योजकतेचे धडेही देण्यात येत आहेत़ - एस.सी. भगुरे, कारागृह अधीक्षक

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादjailतुरुंगvegetableभाज्याorganic vegetablesसेंद्रिय भाज्याFarmerशेतकरी