शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 3:21 PM

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. तापमानाचा पारा ४० अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हात काम केल्याचा फटका कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील शेतकऱ्याला बसला. उन्हात काम करुन येताच पाणी प्यायल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (farmer's death by sunstroke in Osmanabad) 

उस्मानाबाद जिल्ह्यात तापमान वाढीस लागले आहे. पारा ४० अंशाच्याही पुढे गेला आहे. अशातच तुळजापूरच्या कृषी हवामान केंद्राने कळंब तालुक्यात इतर ठिकाणाहून अधिक तापमान असण्याचा अंदाज वर्तविला होता. शेतकऱ्यांना उन्हात कामे न करण्याचा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला होता. मात्र, हासेगाव केज येथील शेतकरी लिंबराज तुकाराम सुकाळे (५०) हे गुरुवारी दुपारी भर उन्हात शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याने काम थांबवून ते पाण्याच्या ठिकाणी आले. काही वेळ विसावा घेण्याऐवजी सुकाळे हे लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. 

ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सायंकाळी झालेल्या त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही हा उष्माघाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. लिंबराज सुकाळे हे यंदाच्या मोसमातील उष्माघाताचे जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीSun strokeउष्माघातOsmanabadउस्मानाबाद