शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आम्ही कोणाची कळ काढत नाही, काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:06 IST

शरद पवारांचा मोदींवर पलटवार

उमरगा (जि. उस्मानाबाद) : आम्ही कोणाची कळ काढत नाही अन् काढली तर त्यांना महाराष्ट्र सोडत नाही, असा सज्जड इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उमरगा येथे शरद पवार यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले, मोदी यांना पाच वर्षांत काय केले हे सांगता येत नाही. त्यामुळे ते कुटुंबावर बोलतात. गांधी-नेहरू घराण्याला शिव्या घालतात. 

७० वर्षांत काहीच झाले नाही म्हणतात, कारण त्यांना इतिहास आठवत नाही. काँग्रेसने आणि या देशातील जनतेने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र देशात पहिल्यांदाच सैन्याचा राजकीय लाभ घेतला जात आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील वायूदल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते. मग तीन वर्षांपासून एक सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहे, मग त्यावेळी यांची छाती का १५ इंचाची झाली. 

मोदींनी ५५ महिन्यांत ९२ विदेश दौरे केले. देशात १ रुपया आणला नाही. नवीन उद्योग नाही. बेरोजगारी वाढली. त्यावर न बोलता धर्मांध भावना निर्माण करणारे विधान त्यांच्याकडून होते हे दुर्दैव आहे. भाजपचे नेते शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना ‘लावारीस’ म्हणतात. देशातील सैन्याला ४० अतिरेकी मारले म्हणतात, असल्या नेत्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही पवार यांनी केला.

यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसने सैन्य दलाचा नेहमी सन्मान केला आहे. परंतु, त्याचा राजकीय फायदा कोणी उचलला नाही. मात्र  पाकिस्तानच्या ताब्यातील वायू दल अधिकारी अभिनंदन यांना सोडविले की, यांची छाती ५६ इंचाची होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019osmanabad-pcउस्मानाबादSharad Pawarशरद पवार