शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

चारा घेऊन येताना बैल उधळले अन् गाडी उलटली, वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

By बाबुराव चव्हाण | Published: September 06, 2023 1:01 PM

शेतातून बैलगाडी बाहेर पडली असता, अचानक दाेन्ही बैल उधळले.

भूम (जि. धाराशिव) : गुरांच्या चाऱ्यासाठी शेतातील ऊस घेऊन घरी परतत असताना अचानक बैल उधळल्यामुळे बैलागडी उलटली. या दुर्घटनेत ६५ वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेवून मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री भूम तालुक्यातील उळूप शिवारात घडली.

शेतकरी अर्जुन राजाराम वरळे (६५) हे मंगळवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले हाेते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गुरांसाठी ऊस ताेडून ताे बैलगाडीत भरून गावाकडे परतत हाेते. शेतातून बैलगाडी बाहेर पडली असता, अचानक दाेन्ही बैल उधळले. त्यामुळे उसाने भरलेली ही बैलगाडी उलटली. या दुर्घटनेत शेतकरी वरळे गंभीर जखमी झाले. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने भूम येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतरन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

चाऱ्यासाठी ऊस आणायला गेले अन्...भूमसह परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस नाही. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकरी उसाचा वापर चारा म्हणून करीत आहेत. हाच चारा आणण्यासाठी वरळे बैलगाडी घेऊन शेतात गेले हाेते. चारा घेऊन परतत असतानाच काळाने गाठले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद