शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात घातला विळा, पतीला १० वर्षांची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:57 IST

चारित्र्यावर संशय घेऊन केला होता जिवघेणा हल्ला

धाराशिव : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात चेहऱ्यावर विळ्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न कोंड येथील एकाने १ सप्टेंबर २०२१ रोजी केला होता. याप्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण होऊन गुरुवारी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्या. आर.एस. गुप्ता यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी ठोठावली आहे.

धाराशिव तालुक्यातील कोंड येथील आरोपी नरसिंग गोरोबा चव्हाण हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमीच मारहाण करीत होता. १ सप्टेंबर २०२१ रोजी शेतात मूग-उडीद काढत असतानाही दोघांत यावरुन वाद झाला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पत्नीच्या डोक्यात आधी काठीने वार केला. पाठोपाठ विळ्याने डोक्यात, चेहऱ्यावर वार करुन हातही फ्रॅक्चर केला. या घटनेत गंभीर झालेल्या महिलेवर लातूर येथे उपचार करण्यात आले.

दरम्यान, त्यांचा मुलगा सचिन चव्हाण याने ३ सप्टेंबरला ढोकी ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नरसिंग चव्हाणवर नोंद केला. पुढे सहायक निरीक्षक सुरेश बनसोडे व जगदीश राऊत यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी समोर आलेले साक्षी-पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन गुरुवारी न्या. आर.एस. गुप्ता यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

५५ हजारांचा दंडही ठोठावला...आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी सुनावतानाच न्या. गुप्ता यांनी कलम ३०७ अंतर्गत ५० हजार रुपये व कलम ५०४, ५०६ अन्वये प्रत्येकी अडीच हजार, असा एकूण ५५ हजारांचा द्रव्यदंडही ठोठावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिवCourtन्यायालय