शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना ५० टक्के आरक्षण देणार; राहुल गांधी यांची महिला न्याय हक्क परिषदेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 06:09 IST

कोणताही सर्व्हे करणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याची घोषणा केली. पण, सर्व्हे केल्यानंतर दहा वर्षांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास कुठलाही सर्व्हे न करता महिलांना ५० टक्के आरक्षण देईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी महिला परिषदेत केली. यावेळी त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण घोषणा करीत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद पार पडली. सुरत बायपासवरील मैदानावर झालेल्या या परिषदेस राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकात हंडोरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते. १९ मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी यांनी देशातील शेतकरी, मजूर वर्ग, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यावर कशाप्रकारे अन्याय होत असल्याचे सांगितले. 

पंचसूत्रीत नेमके काय?

- महालक्ष्मी - देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये जमा करण्यात येतील.- आधी आबादी, पूरा हक - सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येईल.- शक्ती का सन्मान - अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन योजनेतील महिला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दुप्पट करण्यात येईल.- अधिकार मैत्री - महिलांना त्यांच्या हक्कांबाबत आणि कायदेशीर खटल्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.- सावित्रीबाई फुले वसतिगृह - प्रत्येक जिल्हा मुख्यालयी केंद्र सरकारच्या वतीने नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात येईल. तसेच देशातील इतर वसतिगृहांची संख्याही दुप्पट केली जाईल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा