शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

दारूबंदीनंतरही धुळे जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ

By admin | Published: June 10, 2017 1:31 PM

दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली

ऑनलाईन लोकमत / राम निकुंभ  धुळे, दि. 10 - राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दोन महिन्यात अपघातांची संख्या जैसे थे असून त्यात मृत्यूमुखी पडणा:या किंवा जखमींच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 1 एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वेगात, निष्काळजीपणे वाहने चालविणे, अवघड वळणे या कारणाबरोबरच वाहनचालकांकडून मद्यसेवन करून वाहने चालविण्यामुळे अपघात होत असतात. महामार्गावर सहज मद्य उपलब्ध होत असल्याने हे अपघात होत असल्याचे मानले जात होते.त्यामुळे महामार्गावरील परमीट रूम, दारू दुकानांमधून सहज मद्य उपलब्ध होऊ नये, म्हणून महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरावरील दारू विक्री बंद झाली आहे. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील 260 दारू दुकाने बंद झाली आहेत.  त्यात 40 देशी दारू दुकाने, 13 वाईप शॉप, 146 परवाना कक्ष, 61 बिअर शॉपी अशा एकूण 260 दारू दुकानांचा समावेश आह़े जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. सुरत-नागपूर, मुंबई-आग्रा, धुळे-सोलापूर,  अंकलेश्वर-बु:हाणपूर असे महामार्ग जिल्ह्यातून जातात. या मार्गावरील अपघातात वर्षाला 350हून अधिक जणांचा मृत्यू होतो. या महामार्गावरच सर्वाधिक दारू दुकाने होती. महामार्गावरील दारूबंदीनंतर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अपघातांची माहिती घेतली असता, अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे आढळून आले.एप्रिल महिन्यांत प्राणघातक 22 अपघात झाले असून त्यात 25 जणांना जीव गमवावा लागला, 14 गंभीर अपघात होऊन 54 जण गंभीर जखमी झाल़े मे महिन्यात 19 अपघातात 28 जणांचा मृत्यू, तर 21 गंभीर अपघातात 54 जण गंभीर जखमी झाले. दोन्ही महिन्यात 26 किरकोळ अपघातात 74 जखमी झाले आहे.महामार्गावरील दारूबंदी लागू होण्यापूर्वी मार्च महिन्यात 17 प्राणघातक अपघात होऊन 20 जण ठार, तर 8 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात 13 अपघातात 14 ठार, तर 14 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होत़बेकादेशीर दारूविक्री रोखण्याची गरज महामार्गावर दारूबंदी असली, तरी हॉटेल्स व धाब्यांवर सहज दारू उपलब्ध होत आहे. पोलिसांनी केलेल्या हॉटेलमधील छाप्यांवरूनही ही बाबसमोर येत आहे.  बेकायदेशीर दारू विक्री रोखल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. अपेक्षा फोल कारण नेमके काय?फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल-मे महिन्यांच्या या तुलनेनुसार प्राणघातक  अपघातांची संख्या या कालावधीत सारखीच 30 एवढी असली तरी मृतांच्या संख्येत मात्र दारूबंदीनंतर 34 वरून 53 अशी दीडपट वाढ झाली आहे. गंभीर अपघातांची संख्या 22 वरून 35 अशी वाढली असून जखमींच्या प्रमाणातही 56 वरून 108 अशी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ अपघात मात्र दारूबंदीनंतर 31 ऐवजी 26 असे घटले आहेत. याऊलट जखमींच्या संख्येत मात्र पुन्हा 60 वरून 74 अशी सव्वा पट वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पाहता दारूबंदीनंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अपघातांची संख्या घटेल व प्राणहानी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे मात्र एप्रिल व मे महिन्यात असलेल्या सुटय़ा व लगAसराईच्या हंगामामुळेसुद्धा वाहतुकीत वाढ होऊन अपघातांची संख्या वाढल्याचे कारण देण्यात येत आहे.