शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 1:22 PM

शिरपूर कृषी बाजार समिती : तब्बल आठ दिवसापासून नंबर लावून ट्रॅक्टर उभे असतांना मका मोजण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते़ मात्र तब्बल आठ दिवसापासून भरड धान्य विक्रीसाठी रांगेत शेतकऱ्यांनी वाहने लावलेली असतांना देखील १५ जुलैपासून अचानक खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांनी शुक्रवारपासून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्याचठिकाणी थांबणार असल्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले़मार्केट आवारातील खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केली जात होती़ मात्र शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक असतांना हजारावर शेतकºयांनी केली, परंतु काही शेतकºयांनी न करता प्रत्यक्ष मोजमाफ केंद्रावर येवून त्यांच्याकडून संबंधित संघाच्या कर्मचाºयाने शेतकºयांचे ७/१२ उतारा गोळा करून प्रत्येकाकडून काही रक्कम घेवून आॅनलाईन नोंदणी करण्यात येईल असे शेतकºयांना सांगण्यात आले होते़ त्यामुळे शेतकºयांनी संबंधित कर्मचाºयावर भरवसा ठेवून ७/१२ उतारा दिला होता़ मात्र त्या कर्मचाºयाने वशिलेबाजी करीत बºयाच शेतकºयांची मोजणी केली़ दरम्यान, मोजणी धिम्यागतीने सुरू होती़कोरोनाचा लॉकडाऊन व जनता कर्फ्युमुळे शेतकºयांना ज्यावेळी खरेदीचा नंबर लागेल त्या आदल्या दिवशी एस़एम़एस़ करून कळविले जात होते़ परंतु त्याचा फायदा घेत संघाच्या कर्मचाºयाने अर्थपूर्ण व्यवहार व वशिलेबाजी करून बºयाच शेतकºयांचा माल खरेदी केला़जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी मोजमाफ केंद्रावर वाहनांसह उभे राहून सुध्दा त्यांचा आजही नंबर लागलेला नाही़ तशातच १५ जुलैपासून खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगून सदरचे वाहने घरी घेवून जाण्याचे सांगण्यात आले़ मात्र शेतकºयांनी मोजमाफ ठिकाणी असलेल्या ३० वाहनांची मोजणी होईल या अपेक्षेने ठाण मांडून बसले आहेत़१७ रोजी या संदर्भातले निवेदन शेतकºयांनी तहसिलदाराना दिले़ त्यात शेतकºयांनी फेडरेशनमध्ये नोंदणी केलेली असतांना मोबाईलवर मॅसेज येवून माल विक्रीस करण्यासाठी मार्केटला आणावा असे कळविण्यात आले़त्यामुळे शेतकºयांनी ६ जुलै रोजी भाड्याचे वाहने करून मका विक्री करण्यासाठी मार्केट आवारात आणला़ त्यानंतर आठवडा उलटूनही माल खरेदी होत नसल्यामुळे संबंधित कर्मचाºयांना भेटल्यावर ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते़ दररोज शेतकरी त्या कर्मचाºयांना भेट होते़ ८ ते १० दिवस होवूनही मका खरेदी करण्यात आलेला नाही़विशेषत: गरजु शेतकºयांनी जेवण सुध्दा तेथेच करीत आहेत़ सध्या पावसाळ्याचे दिवस असतांना शेतीचे अनेक कामे सुरू असतांना ते सोडून या ठिकाणी थांबावे लागत असल्यामुळे तेथे देखील नुकसान सहन करावे लागत आहे़प्रशासनाने नियमानुसार मका खरेदी करावा तसेच संबंधितांचा हलगर्जीपणामुळे इतर होत असलेला खर्चही देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे़ठिय्या आंदोलन सुरुचशुक्रवारी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकºयांनी आपले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सायंकाळीही सुरु ठेवले होते. तसेच जोपर्यंत आमचा मका खरेदी केला जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी यावेळी व्यक्त केला.