शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:01 PM

ढगाळ वातावरण : तुर, हरभरा, गहू काढणीवर नुकसानीचे सावट; तुर शेंगा पडल्या काळ्या...

कापडणे : मागील आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे कापडणेसह परिसरातील धनुर, लोणकुटे, धमाणे, देवभाने, सरवड, सोनगीर, तामसवाडी, हेकंळवाडी, न्याहळोद, बिलाडी या परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे व बदलत्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, दादर यासह काढणी व कापणीवर आलेल्या तूर पिकावरही नुकसानकारक वातावरणाचा दुष्परिणाम होत आहे.यंदा खरीप हंगामात पावसाने पेरणीच्या वेळेस वारंवार दडी मारल्याने सर्वत्र शेतकऱ्यांच्या पेरण्या दुबार व तिबार झालेल्या होत्या. जेमतेम पिके जगवून हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, कापूस, सोयाबीन आदी काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकेही परतीच्या व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतली व शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यातून जेमतेम शेतकरी सावरत नाही तोपर्यंत शेतकºयांच्या रब्बी हंगामातील सर्वत्र शेतीपिकांचे या दूषित व ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे.कापडणेसह परिसरात आठवडाभरापासून ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील मुख्य समजले जाणारे गहू, हरभरा व भाजीपाला पिकावर खूप मोठा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. कधी थंडी जास्तच वाढते तर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडी गायब होते. अशा या बदलत्या वातावरणामुळे परिसरातील शेतकºयांच्या रब्बी हंगामातील शेतीपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.सध्या तापमानाचा पारा हा सहा अंशांवर स्थिरावला असून थंडीचे प्रमाण अधिक असल्याने गहू व हरभºयाला हे वातावरण पोषक आहे. मात्र लगेच बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे